AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | World Cup च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईत एक गोष्ट टीम इंडियाच्या बाजूने नसेल, कुठली?

IND vs AUS | रोहित अँड कंपनी हा अडथळा कसा पार करणार?. आजपासून वर्ल्ड कप स्पर्धेला शुभारंभ होत आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात अजून तीन दिवस आहेत. टीम इंडियाने नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज जिंकली.

IND vs AUS | World Cup च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईत एक गोष्ट टीम इंडियाच्या बाजूने नसेल, कुठली?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना विक्रमांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर रेकॉर्ड रचू शकतात. तर कर्णधार रोहित शर्मा याच्याकडेही संधी आहे
| Updated on: Oct 05, 2023 | 8:47 AM
Share

नवी दिल्ली : संपूर्ण क्रिकेट विश्वाच लक्ष असलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. वर्ल्ड कप आजपासून सुरु होत असला, तरी टीम इंडियाच्या पहिल्या सामन्याला अजून तीन दिवस बाकी आहेत. टीम इंडिया 8 ऑक्टोंबरपासून वर्ल्ड कपमधील आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. चेन्नईमध्ये ही मॅच होणार आहे. वर्ल्ड कपआधी वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2-1 ने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला अलीकडे सलग 2 वनडे सीरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आधी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 3-2 ने नमवलं. त्यानंतर भारत दौऱ्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण वॉर्म अप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने जबरदस्त खेळ दाखवला. त्यावरुन ही टीम केव्हाही बाजी पलटू शकते हे स्पष्ट आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवलं असलं, तरी चेन्नईमध्ये आकडे वेगळीच गोष्ट सांगतात.

चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाची बाजू भारतापेक्षा वरचढ आहे. चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने एकूण 6 वनडे सामने खेळले आहेत. यात फक्त एका मॅचमध्ये पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाने या मैदानात 4 टीम्सना पराभवाच पाणी पाजलय. यात टीम इंडिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेची टीम आहे. चेपॉक स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 3 वेळा आमने-सामने आले आहेत. यात 3 पैकी फक्त एका सामन्यात टीम इंडियाला विजय मिळालाय. 2017 मध्ये टीम इंडियाला एकमेव विजय मिळाला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम 1987 साली या मैदानात टीम इंडियावर 1 रन्सने विजय मिळवला होता. दोन्ही टीम्समध्ये याच मैदानात मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला गेला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. दोन्ही टीम्समध्ये या मैदानात 3 सामने झालेत. यात 2 वेळा ऑस्ट्रेलियाने बाजी मारलीय. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच सरस

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपचे आकडे पाहिले तर, इथे सुद्धा ऑस्ट्रेलिया सरस आहे. दोन्ही टीम्स वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 12 वेळा आमने-सामने आल्या आहेत. यात टीम इंडिया फक्त 4 वेळा विजयी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने 8 सामने जिंकलेत. आता 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आकड्याचा हा खेळ बदलणार का? यावर लक्ष असेल.

Follow Us
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू