AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI | महेंद्रसिंह धोनी याला बीसीसीआयमध्ये मिळणार ‘ही’ जबाबदारी?

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप तसेच चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली आहे.

BCCI | महेंद्रसिंह धोनी याला बीसीसीआयमध्ये मिळणार 'ही' जबाबदारी?
| Updated on: Feb 16, 2023 | 9:41 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनंतर एकच खळबळ उडाली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. टीम इंडियाचे खेळाडू हे फिटनेससाठी इंजेक्शन घेतात, असा गौप्यस्फोट शर्मा यांनी केला. बीसीसीआयने आतापर्यंत शर्मा यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र शर्मा यांना निवड समिती प्रमुख पद सोडावं लागेल, असं म्हटलं जात आहे. अशात एका दिग्गज खेळाडूने निवड समिती प्रमुख म्हणून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचं नाव सुचवलं आहे.

चेतन शर्मा अडचणीत

चेतन शर्मा यांनी अनेक गौप्यस्फोट या स्टिंगमध्ये केले. त्यानंतर शर्मा यांचं पद धोक्यात आलं आहे. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर शर्मा यांना निवड समिती प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं. मात्र 2 महिन्यांनी पुन्हा त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. या स्टिंगनंतर शर्मा यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतलीय. या सर्व दरम्यान शेजारील देशातून एक सूचना देण्यात आली आहे.

निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी धोनीचं नाव

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानेश कनेरिया याने बीसीसाआयला सूचना केली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला निवड समितीचा प्रमुख करा, अशी सूचना कनेरिया याने केली आहे.

कनेरिया काय बोलला?

“महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत बीसीसीआय अधिकाऱ्यांसह एकदा बोलायला हवं. अधिकाऱ्यांनी धोनीचा प्लान काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तसेच धोनी निवड समिती प्रमुख बनायला तयार आहे का, हे माहित करुन घ्यायला हवं. आता वेळ आली आहे की, बीसीसीआय, अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी कडक कारवाई करत पुन्हा नव्याने निवड समिती तयार गठीत करायला हवी”, असं कनेरिया एका मुलाखतीत म्हणाला.

धोनीचं तोंडभरून कौतुक

कनेरिया याने धोनीचं तोंडभरून कौतुक केलं. “बीसीसीआयने निवड समितीत नवीन चेहऱ्यांचा समावेश करायची गरज आहे. धोनी बुद्धीमान आहे. तो एक शानदार खेळाडू आहे. असं सर्व असताना त्याच्यासारखा खेळाडू निवड समितीत का नाही?”, असा सवालही कनेरिया याने उपस्थित केला.

शुक्रवारपासून दुसरी कसोटी

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा शुक्रवार 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?