
भारतीय कसोटी संघाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. इंग्लंडने लीड्समध्ये खेळवण्यात आलेला सामना 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान मिळालं होतं. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. तर पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडने 350 धावा करत विजय साकारला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून होणार आहे. शुबमन गिल याच्या कसोटी कारकीर्दीतील कर्णधार म्हणून हा पहिला सामना होता. शुबमनला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला विजयी करण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाने अनेक संधी गमावल्या. त्यामुळे सामना इंग्लंडने जिंकला. भारताकडून या सामन्यात 4 फलंदाजांनी 5 शतकं केल्यानंतरही पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाच्या टॉप फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. मात्र या सामन्यातील काही चुकांमुळे भारताने इंग्लंडला विजयी होण्यास मदत केली, असं म्हटलं...