वयाच्या 14 व्या वर्षी झाला ब्लड कॅन्सर, युवराज सिंग सारखा लढला, आता ठोकल्या 548 धावा

कमलला वयाच्या 14 व्या वर्षी ब्ल्ड कॅन्सर झाला होता. त्याच्या ब्लड प्लेटलेट्स भरपूर कमी झाल्या होत्या. दिल्लीमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. त्यात त्याला स्टेज 2 चा ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं.

वयाच्या 14 व्या वर्षी झाला ब्लड कॅन्सर, युवराज सिंग सारखा लढला, आता ठोकल्या 548 धावा
Uttara khand cricketer kamal singh Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:57 AM

मुंबई: रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडचा मोठा पराभव केला. मुंबईने तब्बल 725 धावांनी उत्तराखंडवर विजय मिळवला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. या पराभवानंतर उत्तराखंड क्रिकेट असोशिएशन (Uttarakhand Cricket Association) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. उत्तराखंड क्रिकेट असोशिएशनशी अनेक वादही जोडले गेले आहेत. उत्तराखंडकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना वेळेवर हक्काचे पैसे मिळत नाहीयत. मात्र या परिस्थितीतही संघात असे काही खेळाडू आहेत, जे आपल्या प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियात संधीची वाट पाहतायत. या सीजनमध्ये उत्तराखंडसाठी काही खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलं. 21 वर्षाचा कमल सिंह (Kamal Singh) या खेळाडूंपैकी एक आहे. कमल सिंहने उत्तराखंडसाठी रणजी ट्रॉफीमध्ये 10 सामन्यात 548 धावा फटकावल्या.

त्याच्याच बळावर संघ क्वार्टर फायनलमध्ये

सर्विस विरोधात मागच्यावर्षी त्याने 82 धावांची इनिंग खेळली होती. 2020-21 मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत संघासाठी त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याच्याच बळावर संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला होता. कमल सिंह साठी क्रिकेट सर्वकाही आहे. याच खेळाने त्याला जिवंत ठेवलय. कमलला लहान वयात कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढाव लागलं.

ब्लड कॅन्सरशी लढाई

कमलला वयाच्या 14 व्या वर्षी ब्ल्ड कॅन्सर झाला होता. त्याच्या ब्लड प्लेटलेट्स भरपूर कमी झाल्या होत्या. दिल्लीमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. त्यात त्याला स्टेज 2 चा ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं. पुढचं एक वर्ष कमलला खेळ आणि अभ्यासापासून लांब रहाव लागलं. अनेक महिने त्याला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागलं. त्यावेळी क्रिकेटमुळेच मला लढण्याच बळ मिळाल, अस कमल सांगतो. बिछान्यावर असताना मी मैदानात कधी परतणार, हाच विचार माझ्या डोक्यात चालू असायचा, असं कमल म्हणाला. क्रिकेट खेळण्याची माझी दृढइच्छाशक्ती होती. त्यामुळेच मी कॅन्सरवर मात करु शकलो, असं कमलने क्रिकबजशी बोलताना सांगितलं.

त्याला समजलं तेव्हा….

कमल त्यावेळी टीवी वर येणारा क्रिकेटचा प्रत्येक सामना पहायचा. कुटुंबातील सदस्यांनी बराच काळ कमलपासून त्याचा आजार लपवून ठेवला होता. त्यांनी कमलला जराशीही त्याच्या आजाराची कल्पना येऊ दिली नाही. कमलला या बद्दल समजल, तेव्हा त्याला जास्त फरक पडला नाही, कारण तो पर्यंत त्याला उपचारांची आणि केमोथेरपची सवय झाली होती. कमललला गौतम गंभीर सारखी फलंदाज बनायचं आहे.

मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेन, असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण आता हळूहळू हे स्वप्न सत्यात येऊ शकतं, असं वाटायला लागलय, असं कमल म्हणतो.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.