AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या मुलांची कमाल, Ranji Trophy मध्ये महारेकॉर्ड, 725 धावांनी मिळवला विजय

रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडला (Mumbai vs Uttarakhand) हरवून इतिहास रचला आहे. मुंबईने उत्तराखंडवर 725 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

मुंबईच्या मुलांची कमाल, Ranji Trophy मध्ये महारेकॉर्ड, 725 धावांनी मिळवला विजय
Mumbai Record win over uttarakhand Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 09, 2022 | 2:28 PM
Share

मुंबई: रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने उत्तराखंडला (Mumbai vs Uttarakhand) हरवून इतिहास रचला आहे. मुंबईने उत्तराखंडवर 725 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय (Record win of Mumbai) आहे. मुंबईने उत्तराखंडला विजयासाठी 795 धावांचं टार्गेट दिलं होतं. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याडावात उत्तराखंडची टीम अवघ्या 69 रन्समध्ये ऑलआऊट झाली. रणजी ट्रॉफीच नाही, फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 1929-30 साली न्यू साउथ वेल्सने क्वीन्सलँडला 625 धावांनी हरवलं होतं. आता 93 वर्षानंतर मुंबईने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये

मुंबईच्या टीमने क्वार्टरफायनलमध्ये उत्तराखंडवर एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या डावात मुंबईने 8 विकेट गमावून 647 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुवेद पारकरने डेब्यु मॅचमध्येच 252 धावा फटकावल्या. सर्फराज खानने 153 धावा केल्या. अरमान जाफरने 60 आणि शम्स मुलानी 59 धावांची इनिंग खेळला. उत्तराखंडचा पहिला डाव 114 धावात आटोपला. कमल सिंहच्या 40 धावांशिवाय दुसरा कुठलाही खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कॅप्टन जय बिस्ता तर पहिल्या चेंडूवर आऊट झाला. दुसऱ्या डावात कॅप्टन पृथ्वी शॉ ने 72 आणि यशस्वी जैस्वाल 103 धावांची शतकी खेळी खेळला. विकेटकीपर आदित्य तरेने 57 धावा केल्या. दुसरा डाव मुंबईने 261 धावांवर घोषित केला. त्यानंतर 795 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा डाव 69 धावात आटोपला.

पृथ्वी शॉ च्या कॅप्टनशिपचा जलवा

पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली नेहमीच संघाला मोठा विजय मिळाला आहे. 2018 मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वाखालीच भारताने अंडर-19 चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर मागच्यावर्षी त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईने विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली मुंबईने फर्स्ट क्लासच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल