AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Record Break Batting : काय बोलता! नऊही खेळाडूंचे अर्धशतक, रणजी करंडकमध्ये रंगत, कालच्या जोरदार फलंदाजीविषयी जाणून घ्या…

बंगालकडून सायन मंडलने 32 धावांत तीन तर शाहबाज अहमदने पाच धावांत दोन बळी घेतले. 

Record Break Batting : काय बोलता! नऊही खेळाडूंचे अर्धशतक, रणजी करंडकमध्ये रंगत, कालच्या जोरदार फलंदाजीविषयी जाणून घ्या...
नऊही खेळाडूंचे अर्धशतकImage Credit source: social
| Updated on: Jun 09, 2022 | 6:53 AM
Share

बंगळुरू : जगभरात रणजी ट्रॉफीचं (Ranji Trophy) नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. टीम इंडियात एंट्री मिळवण्यासाठी हा शेवटचा टप्पा मानला जातो. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बुधवारी जे घडलं ते आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होतं. अनेकांना याबाबत आश्चर्यही व्यक्त केलं. आघाडीच्या नऊ फलंदाजांनी एका डावात 50 आणि त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. विक्रमी फलंदाजी करणाऱ्या बंगालनं (Bengal) दोन फलंदाजांची शतके आणि सात फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर सात बाद 773 धावांवर डाव घोषित केला. एवढ्या मार खाल्ल्यानंतर झारखंडनं (Jharkhand) आता यष्टीचीत होईपर्यंत 5 विकेट्सवर 139 धावा केल्या आहेत. त्यामुळे येथील रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सामन्यावर पकड घट्ट केली.

यापूर्वी पहिल्या आठ फलंदाजांनी प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात किमान 50 धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणीच्या डावात किमान आठ फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्याचा एकमेव प्रसंग 1893 मध्ये होता. जेव्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंड दौऱ्यावर ऑक्स आणि कॅम्ब संघाविरुद्ध 843 धावा केल्या होत्या.

सलामीवीर अभिषेक रमन (61) आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (65) आणि अभिषेक पोरेल (68) यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त सुदीप कुमार घारामी (186) आणि अनुस्तुप मजुमदार (117) यांनी सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी शतके झळकावली.

कोणत्या खेळाडूच्या किती धावा?

बुधवारी तिसऱ्या दिवशी मनोज तिवारी (73), शाहबाज अहमद (78), सायन मंडल (नाबाद 53) आणि आकाश दीप (नाबाद 53) यांनी अर्धशतके झळकावली. आकाश दीपने दमदार फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत आठ षटकार ठोकले. झारखंडसाठी सुशांत मिश्राने 140 धावांत 3 तर शाहबाज नदीमने 175 धावांत 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात झारखंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 139 धावांत पाच गडी गमावले. सलामीवीर नाझिम सिद्दीकी (53) केवळ फलंदाजी करू शकला. कर्णधार सौरभ तिवारीने 33 धावांचे योगदान दिले. यष्टीमागे विराट सिंग १७ तर अनुकुल रॉय एक धाव घेत होता.

बंगालकडून सायन मंडलने 32 धावांत तीन तर शाहबाज अहमदने पाच धावांत दोन बळी घेतले. झारखंड संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी अजून 435 धावांची गरज आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.