AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Record Break Batting : काय बोलता! नऊही खेळाडूंचे अर्धशतक, रणजी करंडकमध्ये रंगत, कालच्या जोरदार फलंदाजीविषयी जाणून घ्या…

बंगालकडून सायन मंडलने 32 धावांत तीन तर शाहबाज अहमदने पाच धावांत दोन बळी घेतले. 

Record Break Batting : काय बोलता! नऊही खेळाडूंचे अर्धशतक, रणजी करंडकमध्ये रंगत, कालच्या जोरदार फलंदाजीविषयी जाणून घ्या...
नऊही खेळाडूंचे अर्धशतकImage Credit source: social
| Updated on: Jun 09, 2022 | 6:53 AM
Share

बंगळुरू : जगभरात रणजी ट्रॉफीचं (Ranji Trophy) नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. टीम इंडियात एंट्री मिळवण्यासाठी हा शेवटचा टप्पा मानला जातो. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बुधवारी जे घडलं ते आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होतं. अनेकांना याबाबत आश्चर्यही व्यक्त केलं. आघाडीच्या नऊ फलंदाजांनी एका डावात 50 आणि त्याहून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. विक्रमी फलंदाजी करणाऱ्या बंगालनं (Bengal) दोन फलंदाजांची शतके आणि सात फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर सात बाद 773 धावांवर डाव घोषित केला. एवढ्या मार खाल्ल्यानंतर झारखंडनं (Jharkhand) आता यष्टीचीत होईपर्यंत 5 विकेट्सवर 139 धावा केल्या आहेत. त्यामुळे येथील रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सामन्यावर पकड घट्ट केली.

यापूर्वी पहिल्या आठ फलंदाजांनी प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात किमान 50 धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणीच्या डावात किमान आठ फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्याचा एकमेव प्रसंग 1893 मध्ये होता. जेव्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंड दौऱ्यावर ऑक्स आणि कॅम्ब संघाविरुद्ध 843 धावा केल्या होत्या.

सलामीवीर अभिषेक रमन (61) आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (65) आणि अभिषेक पोरेल (68) यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त सुदीप कुमार घारामी (186) आणि अनुस्तुप मजुमदार (117) यांनी सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी शतके झळकावली.

कोणत्या खेळाडूच्या किती धावा?

बुधवारी तिसऱ्या दिवशी मनोज तिवारी (73), शाहबाज अहमद (78), सायन मंडल (नाबाद 53) आणि आकाश दीप (नाबाद 53) यांनी अर्धशतके झळकावली. आकाश दीपने दमदार फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत आठ षटकार ठोकले. झारखंडसाठी सुशांत मिश्राने 140 धावांत 3 तर शाहबाज नदीमने 175 धावांत 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात झारखंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 139 धावांत पाच गडी गमावले. सलामीवीर नाझिम सिद्दीकी (53) केवळ फलंदाजी करू शकला. कर्णधार सौरभ तिवारीने 33 धावांचे योगदान दिले. यष्टीमागे विराट सिंग १७ तर अनुकुल रॉय एक धाव घेत होता.

बंगालकडून सायन मंडलने 32 धावांत तीन तर शाहबाज अहमदने पाच धावांत दोन बळी घेतले. झारखंड संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी अजून 435 धावांची गरज आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.