AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mi vs CSk : हा क्षण ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, मुंबई इंडिअन्सच्या पराभवाची मुख्य कारणं!

चेन्नईकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांची निराशा झाली. मुंबईची ताकत ही फलंदाजी आहे मात्र बॅटर्सनेच सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच काही अशीसुद्धा कारणं आहेत ज्यामुळे मुंबईने सामना गमावला.

Mi vs CSk : हा क्षण ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, मुंबई इंडिअन्सच्या पराभवाची मुख्य कारणं!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 09, 2023 | 4:01 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या तुल्यबळ संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात मुंबईवर चेन्नई संघाने 7 विकेट्स ने विजय मिळवला, यंदाच्या पर्वातील मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतर पलटण घरच्या मैदानावर विजय मिळवेल अशी अशा सर्व चाहत्यांना होती मात्र चेन्नईकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांची निराशा झाली. मुंबईची ताकत ही फलंदाजी आहे मात्र बॅटर्सनेच सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच काही अशीसुद्धा कारणं आहेत ज्यामुळे मुंबईने सामना गमावला.

मुंबई  संघाने एकदम झकास सुरूवात केली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी चौकार षटकार मार आक्रमक सुरूवात करून दिली होती. रोहितला तुषार देशपांडेने बोल्ड आऊट केलं त्यानंतरही ईशानने आपली फटकेबाजी कायम ठेवली होती. मात्र त्यानंतर संघाच्या 64 धावांवर ईशानला जडेजाने आपल्या जाळ्यात अडकवलं.

ईशान मोठा  फटका खेळण्याच्या नादात कॅच आऊट झाला. सामन्यातील ही विकेट टर्निंग पॉईंट ठरली. कारण ईशान बाद झाल्यावर मुंबईच्या खेळाडूंना भागीदारी करता आली नाही. ईशाननंतर सूर्यकुमार यादव 1 धाव काढून आऊट झाला, आता आशा होती ती म्हणजे युवा खेळाडू तिलक वर्मा याच्याकडून कारण मागील सामन्यातही त्यानेच शेवटपर्यंत फलंदाजी करत एकट्याने संघाला सन्मानजनक मजल मारून दिली  होती.

तिलक वर्माही बाद झाला, मुंबईचे मधल्या फळीतील भरवशाचे फलंदाज ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड यांनीही मोठी खेळी करता आली नाही. यामधील एका खेळाडूने जरी शेवटपर्यंत टिकून राहत फलंदाजी केली असती तर धावसंख्या 180 पेक्षा जास्त झाली असती.

मुंबईच्या बॉलिंग विभागातही हुकमी एक्क्क्यासारखे गोलंदाज नाहीत. याआधी कमी स्कोर असतानाही कित्येकवेळा सामने जिंकून दिले आहेत. मात्र आज डेव्हॉन कॉनवेची सुरूवातीची विकेट गमावल्यावर  विकेट मिळवता आली नाही. अजिंक्य रहाणेने सामना पूर्णपणे मुंबईच्या पारड्यात झुकवला होता.

दरम्यान, विकेटच न गेल्याने गोलंदाजांचा आत्मविश्वास कमी झालेला दिसून आला.  कोणत्याही गोलंदाजाने भेदक असा मारा केला नाही. त्यामुळे सीएसकेने सहजपणे मुंबई संघावर मात केली.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?