रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?
भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहेत. त्यामुळे इंग्लंड मालिकेनंतर आता दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानात कधी उतरणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.

Rohit Sharma-Virat Kohli Next Match: भारत इंग्लंड मालिका बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आली. या मालिकेत भारताची हाराकिरी झाली. टी20 मालिकेनंतर वनडे मालिकाही भारताने गमावली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारता 1-2 ने पराभव झाला. भारताने मालिका गमावली असली तर संघाचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सूर गवसला आहे. विराट कोहलीने दुसऱ्या वनडे सामन्यापासून सूर पकडला. तर रोहित शर्माने शेवटच्या सामन्यात टीकाकारांची बोलती बंद केली. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 110 चेंडूत 138 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 60 चेंडूत 74 धावा केल्या. दोन्ही दिग्गजांनी साजेशी खेळी केली, पण संघाला काही विजय मिळाला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 387 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 360 धावांवर अडखळला आणि 27 धावांनी पराभव झाला. असं असताना आता भारतीय क्रीडाप्रेमींना रोहित शर्मा आणि विराट कोहली जोडी कधी मैदानात उतरणार? याची उत्सुकता आहे. त्यातही रोहित शर्माची या संघात निवड होईल की नाही? हा प्रश्न आहे.
टीम इंडियाची पुढची मालिका कधी?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकत्रच टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. तसेच फक्त वनडे फॉर्मेट खेळण्याचा निर्णय घेतला. दोन्ही दिग्गज खेळाडूंचा पुढचा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्याचा मानस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वनडे मालिका खेळण्यावर भर आहे. आता इंग्लंड मालिका संपल्यानंतर दोन्ही दिग्गज कधी उतरतील? असा प्रश्न आहे. यासाठी क्रीडाप्रेंमी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण भारतीय संघ आता थेट सप्टेंबर महिन्यात वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दोघांना पुन्हा एकत्र खेळताना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींना आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. हा दौरा 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. यात एकूण 3 वनडे सामने खेळणार आहेत.
भारत वेस्ट वनडे मालिकेचं वेळापत्रक
- पहिला वनडे सामना 27 सप्टेंबरला, तिरुवनंतपुरम
- दुसरा वनडे सामना 30 सप्टेंबरला, गुवाहाटी
- तिसरा वनडे सामना 3 ऑक्टोबरला, न्यू चंदीगड
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार
वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत पाच वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका वनडे वर्ल्डकप 2027 दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी महत्त्वाची असणार आहे. कारण या मालिकेत निवडलेल्या बहुतांश खेळाडूंची वनडे वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने तयारी सुरू होईल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात श्रीलंकन संघ भारतात येईल आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल.