AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माची मैदानात परतण्याची धडपड, करिअर वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय!

रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याने वनडे सामन्यात परतण्याची धडपड सुरु आहे. असं असताना आता थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. पण तत्पूर्वी रोहित शर्माने एक इच्छा व्यक्त केली आहे.

रोहित शर्माची मैदानात परतण्याची धडपड, करिअर वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय!
रोहित शर्माची मैदानात परतण्याची धडपड, करिअर वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय!Image Credit source: PTI
| Updated on: Aug 21, 2025 | 3:37 PM
Share

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट सामने खेळणार आहे. कारण टी20 आणि कसोटी संघातून त्याने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते त्याची खेळी पाहण्यासाठी उत्सुक आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही वनडे मालिका किंवा सामना झालेला नाही. बांगलादेशविरुद्धचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर ही प्रतीक्षा लांबली. टीम इंडिया 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत वनडे संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. कारण अद्याप तो त्या पदावरून पायउतार झाला नाही. पण रोहित शर्माने या दौऱ्यापूर्वी एका मालिकेत भाग घेण्याची इच्छा वर्तवली आहे. ही मालिका कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे.

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध रोहित शर्माची खेळण्याची इच्छा

रेव्हस्पोर्ट्सच्या बातमीनुसार, रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी आस्ट्रेलिया ए विरूद्ध 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान अनऑफिशियल वनडे मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया ए टीम भारत ए विरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन वनडे साने खेळणार आहे. वनडे सामने कानपूरमध्ये होणार आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध तीन सामने खेळू इच्छित आहे. कारण या मालिकेतून त्याची चांगली तयारी होऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाचा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रोहितला एकदिवसीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी डिसेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगू शकते. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. रोहित शर्मा आतापर्यंत 273 वनडे सामने खेळला आहे. त्याने 265 डावात 48.76 च्या सरासरीने 11168 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतकं आणि 58 अर्धशतकं ठोकली आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 264 इतकी आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!