AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: कर्णधार रोहित शर्माचा जलवा, मॉर्गन-विलियमसनला मागे टाकून धरमशालात इतिहास रचला

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे.

IND vs SL: कर्णधार रोहित शर्माचा जलवा, मॉर्गन-विलियमसनला मागे टाकून धरमशालात इतिहास रचला
भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला मागे टाकून इतिहास रचला आहे. Image Credit source: BCCI
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 27, 2022 | 11:51 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) युगाची सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हापासून हिटमॅनने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून भारत सतत्याने विजयी होत आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात टीम इंडियाने (Team India) एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. धर्मशाला येथील विजयासह, रोहित शर्मा मायदेशात खेळवण्यात आलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे. रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून ऑईन मॉर्गन आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं आहे.

एवढंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे. भारताने T20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले आणि त्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. इतकेच नाही तर 2019 पासून घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे.

रोहितच्या नेतृत्वाची सर्वांनाच कल्पना आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाच जेतेपदं पटकावली आहेत. विराट कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत रोहित नेतृत्व करत असे आणि तेव्हाही तो खूप यशस्वी ठरला आहे.

मॉर्गन-विल्यमसनला मागे टाकलं

रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली असून तो आता इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकण्यात रोहित यशस्वी झाला आहे. रोहितने मायदेशात म्हणजेच भारतात 17 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 16 सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत मायदेशात सर्वाधिक T20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहित मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या पुढे गेला आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहितने भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना आधीच मागे टाकलं आहे. रोहितने विराटपेक्षा 3 सामने आणि धोनीपेक्षा 6 सामने जास्त जिंकले आहे.

कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक विजय (T20)

• रोहित शर्मा – 16 विजय (भारत)

• ऑईन मॉर्गन – 15 विजय (इंग्लंड)

• केन विल्यमसन – 15 विजय (न्यूझीलंड)

• अॅरोन फिंच – 13 विजय (ऑस्ट्रेलिया)

• विराट कोहली – 13 विजय (भारत)

भारताचा सलग 11वा T20I मालिका विजय (घरच्या मैदानावर)

  1. भारत Vs श्रीलंका 2-0 (एक सामना बाकी) (2022)
  2. भारत Vs वेस्ट इंडिज 3-0 (2022)
  3. भारत Vs. न्यूझीलंड 3-0 (2022)
  4. भारत Vs. इंग्लंड 3-2 (2021)
  5. भारत Vs. श्रीलंका 2-0 (2019)
  6. भारत Vs. वेस्ट इंडिज 2-1 (2019)
  7. भारत Vs. बांगलादेश 2-1 (2019)

टी-20 क्रिकेटमधील भारतीय कर्णधारांचे रेकॉर्ड्स

  1. एमएस धोनी- 72 सामने, 41 विजय
  2. विराट कोहली- 50 सामने, 30 विजय
  3. रोहित शर्मा- 27 सामने, 23 विजय

इतर बातम्या

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

Follow Us
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!