AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: कर्णधार रोहित शर्माचा जलवा, मॉर्गन-विलियमसनला मागे टाकून धरमशालात इतिहास रचला

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे.

IND vs SL: कर्णधार रोहित शर्माचा जलवा, मॉर्गन-विलियमसनला मागे टाकून धरमशालात इतिहास रचला
भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला मागे टाकून इतिहास रचला आहे. Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 27, 2022 | 11:51 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) युगाची सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हापासून हिटमॅनने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून भारत सतत्याने विजयी होत आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात टीम इंडियाने (Team India) एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. धर्मशाला येथील विजयासह, रोहित शर्मा मायदेशात खेळवण्यात आलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे. रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून ऑईन मॉर्गन आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं आहे.

एवढंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे. भारताने T20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले आणि त्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. इतकेच नाही तर 2019 पासून घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे.

रोहितच्या नेतृत्वाची सर्वांनाच कल्पना आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाच जेतेपदं पटकावली आहेत. विराट कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत रोहित नेतृत्व करत असे आणि तेव्हाही तो खूप यशस्वी ठरला आहे.

मॉर्गन-विल्यमसनला मागे टाकलं

रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली असून तो आता इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकण्यात रोहित यशस्वी झाला आहे. रोहितने मायदेशात म्हणजेच भारतात 17 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 16 सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत मायदेशात सर्वाधिक T20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहित मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या पुढे गेला आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहितने भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना आधीच मागे टाकलं आहे. रोहितने विराटपेक्षा 3 सामने आणि धोनीपेक्षा 6 सामने जास्त जिंकले आहे.

कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक विजय (T20)

• रोहित शर्मा – 16 विजय (भारत)

• ऑईन मॉर्गन – 15 विजय (इंग्लंड)

• केन विल्यमसन – 15 विजय (न्यूझीलंड)

• अॅरोन फिंच – 13 विजय (ऑस्ट्रेलिया)

• विराट कोहली – 13 विजय (भारत)

भारताचा सलग 11वा T20I मालिका विजय (घरच्या मैदानावर)

  1. भारत Vs श्रीलंका 2-0 (एक सामना बाकी) (2022)
  2. भारत Vs वेस्ट इंडिज 3-0 (2022)
  3. भारत Vs. न्यूझीलंड 3-0 (2022)
  4. भारत Vs. इंग्लंड 3-2 (2021)
  5. भारत Vs. श्रीलंका 2-0 (2019)
  6. भारत Vs. वेस्ट इंडिज 2-1 (2019)
  7. भारत Vs. बांगलादेश 2-1 (2019)

टी-20 क्रिकेटमधील भारतीय कर्णधारांचे रेकॉर्ड्स

  1. एमएस धोनी- 72 सामने, 41 विजय
  2. विराट कोहली- 50 सामने, 30 विजय
  3. रोहित शर्मा- 27 सामने, 23 विजय

इतर बातम्या

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

IND vs SL: श्रेयस अय्यर-जाडेजाने लंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं, लिहिली भारताच्या विजयाची स्क्रिप्ट

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.