AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: रोहित शर्माचा जगभरात डंका, पण श्रीलंकेच्या गोलंदाजासमोर मैदानात उभं राहणं अवघड, 26 चेंडूत 5 वेळा बाद

भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या युगाची सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हापासून हिटमॅनने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून भारत सतत्याने विजयी होत आहे.

| Updated on: Feb 27, 2022 | 9:40 AM
Share
भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या युगाची सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हापासून हिटमॅनने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून भारत सतत्याने विजयी होत आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. (Photo: BCCI)

भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या युगाची सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हापासून हिटमॅनने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून भारत सतत्याने विजयी होत आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. (Photo: BCCI)

1 / 5
धर्मशाला येथील विजयासह, रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे. रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून ऑईन मॉर्गन आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं आहे. (Photo: BCCI)

धर्मशाला येथील विजयासह, रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे. रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून ऑईन मॉर्गन आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं आहे. (Photo: BCCI)

2 / 5
एवढंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. (Photo: BCCI)

एवढंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. (Photo: BCCI)

3 / 5
टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे. भारताने T20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले आणि त्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. इतकेच नाही तर 2019 पासून घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे. (Photo: BCCI)

टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे. भारताने T20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले आणि त्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. इतकेच नाही तर 2019 पासून घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे. (Photo: BCCI)

4 / 5
कप्तान रोहितचा जगभरात डंका वाजत असला तरी शनिवारी खेळवण्यात आलेला सामना रोहित शर्मासाठी वैयक्तिकरित्या चांगला नव्हता आणि तो पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज दुष्मंता चामीराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. चामीराने रोहितला बाद करण्याची ही पाचवी वेळ आहे. रोहित शर्माने T20 मध्ये आजपर्यंत रोहितला 26 चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये रोहितने केवळ 32 धावा केल्या आहेत, त्यात तो 5 वेळा बाद झाला आहे. (Photo: BCCI)

कप्तान रोहितचा जगभरात डंका वाजत असला तरी शनिवारी खेळवण्यात आलेला सामना रोहित शर्मासाठी वैयक्तिकरित्या चांगला नव्हता आणि तो पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज दुष्मंता चामीराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. चामीराने रोहितला बाद करण्याची ही पाचवी वेळ आहे. रोहित शर्माने T20 मध्ये आजपर्यंत रोहितला 26 चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये रोहितने केवळ 32 धावा केल्या आहेत, त्यात तो 5 वेळा बाद झाला आहे. (Photo: BCCI)

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.