IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा अष्टपैलू कृणाल पांड्याने जबरदस्त स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 23 धावा दिल्या आणि एक विकेट काढली. जोस बटलरची काढलेली विकेट पाहून सचिन तेंडुलकरने त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला...
IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला...
Image Credit source: PTI
| Updated on: May 31, 2026 | 10:44 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मजबूत पकड राहिली. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीला बाद केलं. त्यामुळे हा सामना पावरप्लेपासूनच आरसीबीच्या पारड्यात झुकलेला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा या जोस बटलरच्या फलंदाजीकडे झुकलेल्या होत्या. कारण बटलर कायम मोठ्या सामन्यात घातक ठरलेला आहे. पण अष्टपैलू कृणाल पांड्याने त्याच्या पुढ्यात एक जादुई चेंडू टाकला. त्या चेंडूचा सामना करताना जोस बटलर फसला. त्याने टाकलेल्या चेंडूचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं कौतुक केलं. कृणाल पांड्याने या सामन्यात त्याने फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने संघाचं 13वं षटक कृणाल पांड्याच्या हाती सोपवलं. जोस बटलर क्रीजवर सेट झाला होता. त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला. कृणाल पांड्याने त्याची रणनिती आधीच हेरली आणि त्याच्यापासून चेंडू लांब ठेवला. वेगाने यॉर्कर लेंथ यॉर्कर टाकला. त्यामुळे जोस बटलरने शेवटच्या क्षणी चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट विकेटकीपर जितेश शर्माच्या हातात गेला. त्याने जराही चूक न करता त्याला यष्टीचीत केलं.

सचिन तेंडुलकरने केलं कौतुक

कृणाल पांड्याची समयसूचकता पाहून सचिन तेंडुलकरनेही त्याचं कौतुक केलं. त्याने सोशल मीडियावर कृणाल पांड्याच्या चेंडूची स्तुती करणारी पोस्ट केली. यात सचिन तेंडुलकरने लिहिलं की, ‘कृणाल पांड्याचा काय अप्रतिम चेंडू होता! चेंडू सोडण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने फलंदाजाच्या पायांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आणि मग एक अचूक चेंडू टाकून त्याला ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवले.’

गुजरात टायटन्सने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 155 धावा केल्या. तसेच विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान आरसीबीसाठी खूपच सोपं आहे.

Follow Us