AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्लेअर ऑफ द मॅच’ विराट कोहलीला दिल्यानंतर संजय मांजरेकर यांचा संताप, म्हणाले…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विराट कोहलीने या सामन्यात 59 चेंडूंचा सामना केला आणि 76 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. पण विराटला हा सन्मान दिल्याने संजय मांजरेकर नाराज झाला आहे.

'प्लेअर ऑफ द मॅच' विराट कोहलीला दिल्यानंतर संजय मांजरेकर यांचा संताप, म्हणाले...
| Updated on: Jul 03, 2024 | 5:01 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयानंतर 17 वर्षांनी भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. भारताने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला झटपट विकेट गेल्याने विराट कोहलीने एक बाजू सावरून धरली. विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. पण या सामन्यात भारत विजयाच्या वाटेवर अनेक घडामोडी घडल्या. 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता असताना जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. तसेच भारताला 7 धावांनी विजय मिळवून दिला. हेन्रिक क्लासेन आणि डेविड मिलर खेळपट्टीवर असताना विजय मिळवणं कठीण होतं. त्यामुळे अशा स्थिती विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार दिल्याने संजय मांजरेकर यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवर संजय मांजरेकर यांनी सांगितलं की, विराट कोहलीऐवजी हा पुरस्कार गोलंदाजाला द्यायला हवा होता.

संजय मांजरेकर यांनी सांगितलं की, “विराट कोहलीच्या खेळीमुळे हार्दिक पांड्याच्या वाटेला फक्त दोन चेंडू आले. भारतीय संघाची फलंदाजी चांगली होती. पण विराट कोहलीच्या खेळीमुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. जर भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली नसती तर भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असता. कारण हेन्रिक क्लासेनने 23 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. सामना 90 टक्के दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे कोहलीच्या जागेवर गोलंदाजाला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा होता. ”

दुसरीकडे, झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचं मत काहीसं वेगळं आहे. भारताने 176 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेसमोर ठेवली ही मोठी गोष्ट आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असता तर विराट कोहलीवर टीका झाली असती, असंही त्यांनी मान्य केलं. दरम्यान, विराट कोहलीने सामनावीराचा पुरस्कार हाती घेताच टी20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता विराट कोहली वनडे आणि कसोटी सामन्यात खेळताना दिसेल.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.