AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकपमध्ये बुमराहपेक्षा शमी ठरणार सरस! गौतम गंभीरनं सांगितलं कारण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीची चर्चा होत आहे. भारतीय फलंदाजांपेक्षा गोलंदाज टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी तारतात. शमीने मागच्या काही सामन्यात भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे.

वर्ल्डकपमध्ये बुमराहपेक्षा शमी ठरणार सरस! गौतम गंभीरनं सांगितलं कारण
मोहम्मद शमी याला सुरुवातीला काही सामन्यात संधी दिली गेली नाही. मात्र शमीला संधी मिळाली तेव्हा त्याने 2 सामन्यात 4 आणि एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. शमीच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये 16 विकेट्स आहेत. आता शमीकडून न्यूझीलंड विरुद्ध तडाखेदार कामगिरी अपेक्षित आहे.
| Updated on: Nov 11, 2023 | 12:09 AM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यात शमीला बेंचवर बसवण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं होतं. मात्र हार्दिक पांड्याला दुखापत झाली आणि शमीची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मग काय मोहम्मद शमीने आलेल्या संधीचं सोनं केलं. धर्मशाळेत पाच गडी बाद करत त्याने पुढच्या सामन्यासाठी आपलं स्थान पक्कं केलं. शमीने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 16 गडी बाद केले आहेत. भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. शमीमुळे भारताच्या गोलंदाजीची धार आणखी वाढली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद सिराज या तिकडीने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं. शमीचं हे प्रदर्शन पाहून गौतम गंभीरने एक भाकीत वर्तवलं आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर?

गौतम गंभीरने एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, मोहम्मद शमी वर्ल्डकपमध्ये बुमराहपेक्षा जास्त गडी बाद करेल. बुमराहने 8 सामन्यात 15 गडी बाद केले आहेत. तर शमीच्या नावावर 16 विकेट्स आहेत. शमीने ही कामगिरी फक्त 4 सामन्यात केली आहे. त्यामुळे बुमराहपेक्षा जास्त गडी बाद करेल.

“बुमराह हा भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे, त्यामुळे विरोधी संघ त्याच्या सामना करण्यासाठी तयारी करतात. पण शमीच्या बाबतीत असं नाही. विरोधी संघ अनेकदा विचार करतात की याचा सामना करू आणि तेव्हाचं तेव्हा पाहू. पण अनेकदा असं होतं की तुमचा बेस्ट गोलंदाजाचा इकोनॉमी रेट चांगला असतो. पण त्याच्या खात्यात तितके विकेट्स नसतात.”, असं गौतम गंभीर पुढे म्हणाला.

“विरोधी संघ बुमराह ऐवजी शमीवर अटॅक करू इच्छिते. पण तो आता व्हेरिएशनसह गोलंदाजी करत आहे. पण असं असलं तरी बुमराह एक्स फॅक्टर आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीला धार मिळाली आहे. त्याच्यामुळे टीम इंडियाला बळ मिळालं आहे. पण मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट घेईल.” , असंही गौतम गंभीर पुढे म्हणाला.

भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी घेतली तर दुसऱ्या डावात शमी आणि बुमराहमध्ये विकेटसाठी स्पर्धा पाहायला मिळेल.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.