AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉर्ड्स कसोटीत रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाबाबत निर्णय होणार?, गांगुलीसह संघ व्यवस्थापनात चर्चा

भारतीय क्रिकेटसंघामध्ये लवकरत काही मोठे बदल होऊ शकतात. आगामी टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री बदलण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे.

लॉर्ड्स कसोटीत रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाबाबत निर्णय होणार?, गांगुलीसह संघ व्यवस्थापनात चर्चा
सौरव गांगुली आणि रवी शास्त्री
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 6:27 PM
Share

लंडन : भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनात (Indian Team) मागील बऱ्याच काळापासून काही मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना बदलणार असल्याची बातमी सतत समोर येत असते. या संबधित एक नवीन अपडेट समोर आला आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्स (Lords Test) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान या बदलाबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यासह इतर अधिकारी लंडनमध्ये या सामन्याला हजेरी लावणार असून यावेळी ते प्रशिक्षक रवी शास्त्रीं यांच्याशी प्रशिक्षक पदाबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ”रवी शास्त्री यांचा कार्यकाळ काही महिन्यांत संपणार असून त्यामुळे त्यांचा करार वाढवण्याबाबत बीसीसीआय चर्चा करणार आहे. लॉर्ड्स येथे सध्या सुरु असलेल्या कसोटीदरम्यान ही चर्चा करणे थोडे लवकर असले तरीही बीसीसीआय़ अध्यक्ष, सचिव आणि शास्त्री स्वत: त्याठिकाणी असल्याने ही योग्य वेळ आहे.”

रवी शास्त्रींच्या कार्यकाळात ICC जेतेपद नाहीच

दरम्यान, रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडिया 2019 वर्ल्डकप सेमीफायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभूत झाली. आतापर्यंत रवी शास्त्री यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकली नाही.

परदेशात जबरदस्त कामगिरी

भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकला नसला तर रवी शास्त्रींच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी केली. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत दोन वेळा कसोटी मालिकेत पराभूत केलं. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंडमध्ये जाऊन जबरदस्त कामगिरी केली.

याशिवाय भारतात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या बलाढ्य संघांवर मात दिली. याशिवाय गेल्या काही दिवसात भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथही सुधारली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2-1 ने विजय मिळवून देण्यात बेंच स्ट्रेंथचा मोठा वाटा होता.

संबंधित बातम्या 

भारताच्या धडाकेबाज महिला क्रिकेटपटूची इंग्लंडमध्ये हवा, 22 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला मिळवून दिला विजय

इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेतला तीन दिग्गजांनी संन्यास, भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षकाचा समावेश

IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीवर दुसरा कसोटी सामना, विराटसह भारतीय फलंदाजांचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड चिंताजनक

(Sourav ganguly and BCCI members may decide ravi shastris future as team india coach at london test)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.