AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: दोन अनकॅप्ड भारतीय गोलंदाजांवर Sourav Ganguly प्रभावित, टीम इंडियात त्यांची जागा पक्की?

PL 2022 मध्ये काही चांगले युवा प्रतिभावान खेळाडू दिसले आहेत. टीम इंडियात त्यांना लवकरात लवकर स्थान मिळावं, यासाठी माजी क्रिकेटपटुंनी त्यांचं समर्थनही केलं आहे.

IPL 2022: दोन अनकॅप्ड भारतीय गोलंदाजांवर Sourav Ganguly प्रभावित, टीम इंडियात त्यांची जागा पक्की?
BCCI President Sourav Ganguly Image Credit source: instagram
| Updated on: May 17, 2022 | 3:40 PM
Share

मुंबई: टॅलेंटला संधी म्हणजे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा. आयपीएलने अनेक युवा, अनकॅप्ड खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसमोर स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्याचा मंच मिळवून दिला आहे. IPL 2022 मध्ये काही चांगले युवा प्रतिभावान खेळाडू दिसले आहेत. टीम इंडियात त्यांना लवकरात लवकर स्थान मिळावं, यासाठी माजी क्रिकेटपटुंनी त्यांचं समर्थनही केलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना सुद्धा दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी (Uncapped Indian Players) प्रभावित केलय. मिड डे दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच कौतुक केलं. उमरान मलिकच्या वेगाची फक्त भारतातच नव्हे, तर शेजारच्या पाकिस्तानातही चर्चा होतेय. उमरानने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्यात. यात एकाच सामन्यात त्याने पाच विकेटही चटकावल्या आहेत. उमरान अनकॅप्ड प्लेयर्समध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे.

शेवटी सिलेक्टर्सना काय तो निर्णय घ्यायचाय

सौरव गांगुलीने राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज कुलदीप सेनचही नाव घेतलं. कुलदीपने सात सामन्यात आठ विकेट घेतल्यात. डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीमुळे त्याने सर्वात जास्त प्रभावित केलय. “150 KMPH किमी प्रतितास वेगाने किती जण गोलंदाजी करतात? राष्ट्रीय संघात त्यांची निवड झाल्यास, मला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना खूप काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. उमरान वेगात गोलंदाजी करतो. मला कुलदीप सेनची गोलंदाजीही आवडली. टी.नटराजननेही कमबॅक केलं आहे. आपल्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी सुद्धा आहेत. शेवटी सिलेक्टर्सना काय तो निर्णय घ्यायचा आहे” असं सौरव म्हणाला.

IPL मधल्या गोलंदाजांबद्दल सौरव म्हणाला…

या सीजनमध्ये गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवलं, त्यावरही सौरवने भाष्य केलं. “बॉलर्सचा वर्चस्व पाहून मला आनंद झाला. मुंबई आणि पुण्यातील खेळपट्टी खूप चांगली होती. त्यावर चेंडूला चांगली उसळी मिळत होती. वेगवान गोलंदाजांच्या बरोबरीने फिरकी गोलंदाजांनीही चांगली बॉलिंग केली” असं सौरव म्हणाला.

आयपीएलचा सीजन संपल्यानंतर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्याची मालिका होणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा दौरा आहे.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.