AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या...
रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्यImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 16, 2022 | 1:03 PM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) बॅटने झगडत आहेत. अशा स्थितीत त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. कारण, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. रोहित आणि विराटच्या खराब फॉर्ममुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना विधान करण्यास भाग पाडले आहे. गांगुलीने मात्र रोहित आणि विराटच्या फॉर्मची काळजी नसल्याचे म्हटले आहे कारण T20 विश्वचषक अजून दूर आहे. पण, गांगुली यांनी असं म्हटलं असलं तरी रोहित आणि विराटच्या सुमार कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. चाहत्यांना देखील त्यांनी नाराजचं केल्याचं ट्विटरवरुन दिसून येतं.

सौरव गांगुली काय म्हणाले?

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मिड-डेशी बोलताना सांगितले की, ‘विराट-रोहितच्या फॉर्मची मला अजिबात चिंता नाही. तो खूप चांगला आणि मोठा खेळाडू आहे. T20 विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि मला विश्वास आहे की हे दोघेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतील. IPL 2022 संपल्यानंतर भारताला 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत रोहित आणि विराटला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

IPL 2022 मध्ये विराटची कामगिरी

लीगच्या 15 व्या मोसमात विराटने 13 सामन्यात 20 पेक्षा कमी सरासरीने 236 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 113 राहिला आहे. त्याला या मोसमात आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. पण तो तीन वेळा गोल्डन डकचाही बळी ठरला आहे. कोहलीची आयपीएलमधील 14 वर्षांतील सर्वात खराब कामगिरी. यापूर्वी, कोहलीने IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये कमी धावा केल्या होत्या.

IPL 2022 मध्ये रोहितची खराब कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून त्याला या मोसमात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यांच्या खराब कामगिरीमुळे मुंबई प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. दरम्यान, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष