Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या...
रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्यImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 1:03 PM

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) बॅटने झगडत आहेत. अशा स्थितीत त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. कारण, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. रोहित आणि विराटच्या खराब फॉर्ममुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना विधान करण्यास भाग पाडले आहे. गांगुलीने मात्र रोहित आणि विराटच्या फॉर्मची काळजी नसल्याचे म्हटले आहे कारण T20 विश्वचषक अजून दूर आहे. पण, गांगुली यांनी असं म्हटलं असलं तरी रोहित आणि विराटच्या सुमार कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. चाहत्यांना देखील त्यांनी नाराजचं केल्याचं ट्विटरवरुन दिसून येतं.

सौरव गांगुली काय म्हणाले?

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मिड-डेशी बोलताना सांगितले की, ‘विराट-रोहितच्या फॉर्मची मला अजिबात चिंता नाही. तो खूप चांगला आणि मोठा खेळाडू आहे. T20 विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि मला विश्वास आहे की हे दोघेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतील. IPL 2022 संपल्यानंतर भारताला 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत रोहित आणि विराटला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

IPL 2022 मध्ये विराटची कामगिरी

लीगच्या 15 व्या मोसमात विराटने 13 सामन्यात 20 पेक्षा कमी सरासरीने 236 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 113 राहिला आहे. त्याला या मोसमात आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. पण तो तीन वेळा गोल्डन डकचाही बळी ठरला आहे. कोहलीची आयपीएलमधील 14 वर्षांतील सर्वात खराब कामगिरी. यापूर्वी, कोहलीने IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये कमी धावा केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

IPL 2022 मध्ये रोहितची खराब कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून त्याला या मोसमात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यांच्या खराब कामगिरीमुळे मुंबई प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. दरम्यान, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.