AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या...
रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्यImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 16, 2022 | 1:03 PM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) बॅटने झगडत आहेत. अशा स्थितीत त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. कारण, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. रोहित आणि विराटच्या खराब फॉर्ममुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना विधान करण्यास भाग पाडले आहे. गांगुलीने मात्र रोहित आणि विराटच्या फॉर्मची काळजी नसल्याचे म्हटले आहे कारण T20 विश्वचषक अजून दूर आहे. पण, गांगुली यांनी असं म्हटलं असलं तरी रोहित आणि विराटच्या सुमार कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. चाहत्यांना देखील त्यांनी नाराजचं केल्याचं ट्विटरवरुन दिसून येतं.

सौरव गांगुली काय म्हणाले?

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मिड-डेशी बोलताना सांगितले की, ‘विराट-रोहितच्या फॉर्मची मला अजिबात चिंता नाही. तो खूप चांगला आणि मोठा खेळाडू आहे. T20 विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि मला विश्वास आहे की हे दोघेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतील. IPL 2022 संपल्यानंतर भारताला 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत रोहित आणि विराटला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

IPL 2022 मध्ये विराटची कामगिरी

लीगच्या 15 व्या मोसमात विराटने 13 सामन्यात 20 पेक्षा कमी सरासरीने 236 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 113 राहिला आहे. त्याला या मोसमात आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. पण तो तीन वेळा गोल्डन डकचाही बळी ठरला आहे. कोहलीची आयपीएलमधील 14 वर्षांतील सर्वात खराब कामगिरी. यापूर्वी, कोहलीने IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये कमी धावा केल्या होत्या.

IPL 2022 मध्ये रोहितची खराब कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून त्याला या मोसमात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यांच्या खराब कामगिरीमुळे मुंबई प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. दरम्यान, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप