AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल सस्पेन्स; या खेळाडूंची नावे निश्चित, पण..

आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील दुसरी कसोटी मालिका भारतीय संघ खेळणार आहे. ही मालिका भारतात असून दोन सामने असणार आहेत.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल सस्पेन्स; या खेळाडूंची नावे निश्चित, पण..
वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल सस्पेन्स; या खेळाडूंची नावे निश्चित, पण..Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 22, 2025 | 10:21 PM
Share

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील गुणतालिकेत टॉप 2 मध्ये राहण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंड दौरा गाजवला होता. पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. आता पुन्हा एकदा दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकण्याचं आव्हान आहे. 2 ऑक्टोबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून या आठवड्यात संघाची घोषणा केली जाईल. या कसोटी मालिकेसाठी बहुतांश खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे. पण इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंना डावललं जाण्याची शक्यता आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय निवड समिती फक्त 15 खेळाडू निवडणार असल्याचं कळत आहे.

भारतीय कसोटी संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखालील 15 खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल जोडी सलामीला उतरेल. तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनचा विचार केला जाईल. इंग्लंड दौऱ्यात काही खास केलं नसलं तरी त्याच्या नावाचा विचार या मालिकेत केला जाईल. ऋषभ पंत दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या ध्रुव जुरेल घेऊ शकतो. फिरकीपटूची जबाबदारी रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेलचा विचार केला जाईल. वेगवान गोलंदाजीचा धुरा मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीपच्या खांद्यावर असेल.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंगचा विचार केला जाऊ शकतो. करुण नायर टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवेल की नाही याबाबत शंका आहे. त्याच्या ऐवजी नितीश कुमार रेड्डी किंवा श्रेयस अय्यरचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील टीममध्ये किती बदल असेल हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. कोण आत आणि कोण बाहेर याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना खूप सारे पर्याय असल्याने खेळाडूंची निवड करणं वाटतं तितकं सोपं नाही.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.