AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल सस्पेन्स; या खेळाडूंची नावे निश्चित, पण..

आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील दुसरी कसोटी मालिका भारतीय संघ खेळणार आहे. ही मालिका भारतात असून दोन सामने असणार आहेत.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल सस्पेन्स; या खेळाडूंची नावे निश्चित, पण..
वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल सस्पेन्स; या खेळाडूंची नावे निश्चित, पण..Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 22, 2025 | 10:21 PM
Share

वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील गुणतालिकेत टॉप 2 मध्ये राहण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंड दौरा गाजवला होता. पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. आता पुन्हा एकदा दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकण्याचं आव्हान आहे. 2 ऑक्टोबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून या आठवड्यात संघाची घोषणा केली जाईल. या कसोटी मालिकेसाठी बहुतांश खेळाडूंची निवड निश्चित मानली जात आहे. पण इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंना डावललं जाण्याची शक्यता आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय निवड समिती फक्त 15 खेळाडू निवडणार असल्याचं कळत आहे.

भारतीय कसोटी संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखालील 15 खेळाडूंचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल जोडी सलामीला उतरेल. तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शनचा विचार केला जाईल. इंग्लंड दौऱ्यात काही खास केलं नसलं तरी त्याच्या नावाचा विचार या मालिकेत केला जाईल. ऋषभ पंत दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या ध्रुव जुरेल घेऊ शकतो. फिरकीपटूची जबाबदारी रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेलचा विचार केला जाईल. वेगवान गोलंदाजीचा धुरा मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीपच्या खांद्यावर असेल.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंगचा विचार केला जाऊ शकतो. करुण नायर टीम इंडियामध्ये पुन्हा स्थान मिळवेल की नाही याबाबत शंका आहे. त्याच्या ऐवजी नितीश कुमार रेड्डी किंवा श्रेयस अय्यरचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील टीममध्ये किती बदल असेल हे येत्या काही तासात स्पष्ट होईल. कोण आत आणि कोण बाहेर याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना खूप सारे पर्याय असल्याने खेळाडूंची निवड करणं वाटतं तितकं सोपं नाही.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.