AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले…

T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताला विजयाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु संघाच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनच जवळपास बाहेर पडला. भारतीय संघाला प्रथम पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले...
भरत अरुण
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 07, 2021 | 5:47 PM
Share

मुंबई : T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताला विजयाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु संघाच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनच जवळपास बाहेर पडला. भारतीय संघाला प्रथम पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताच्या खराब कामगिरीवर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भरत अरुण म्हणाले की, आम्ही कोणतंही कारण देणार नाही, मात्र एक सत्य आपण स्वीकारायला हवं की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या टॅलेंटनुसार कामगिरी केली नाही. (T20 World Cup : Bowling coach Bharat Arun Dissatisfied with the bowlers performance)

भारतीय संघ आपला शेवटचा साखळी सामना सोमवारी नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पत्रकारांना सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळला नाही. दुबईत होणाऱ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीला जास्त महत्त्व असले, तरी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला खूप फायदा होत आहे.

पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही: भरत अरुण

भरत अरुण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी कोणतीही सबब देत नाही, पण या विश्वचषकात असे दिसून आले आहे की नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला खूप फायदा होतो, विशेषत: जेव्हा तुम्ही दुबईत खेळता तेव्हा. जेव्हा तुम्ही नंतर गोलंदाजी करता तेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे होते. हे एक निमित्त नाही, आपण अधिक चांगले प्रदर्शन केले पाहिजे. पहिल्या सामन्यात आम्हाला लक्ष्य वाचवण्याची संधी होती पण आमची गोलंदाजी सरासरी होती.

2 सामने गमावल्यानंतर भारताचे पुनरागमन

पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला आणि त्यानंतर स्कॉटलंडने दिलेले लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 39 चेंडूत गाठलं आणि सेमीफायनलच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. मात्र, टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. जर अफगाणिस्तानने या सामन्यात विजय मिळवल आणि त्यानंतर टीम इंडियाने नामिबियावर विजय मिळवला, तरच विराट आणि कंपनी सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. किवी संघ उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्याने असे होणे कठीण आहे. पहिले दोन सामने गमावल्यामुळे टीम इंडिया अशा प्रकारे अडचणीत सापडली आहे.

इतर बातम्या

निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्वेन ब्राव्होकडून चाहत्यांना खुशखबर, महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा

T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?

पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट

(T20 World Cup : Bowling coach Bharat Arun Dissatisfied with the bowlers performance)

Follow Us
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे