T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले…

T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताला विजयाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु संघाच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनच जवळपास बाहेर पडला. भारतीय संघाला प्रथम पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी, गोलंदाजी प्रशिक्षक खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज, म्हणाले...
भरत अरुण
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 5:47 PM

मुंबई : T20 World Cup 2021 स्पर्धेत भारताला विजयाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु संघाच्या पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतूनच जवळपास बाहेर पडला. भारतीय संघाला प्रथम पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताच्या खराब कामगिरीवर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भरत अरुण म्हणाले की, आम्ही कोणतंही कारण देणार नाही, मात्र एक सत्य आपण स्वीकारायला हवं की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने आपल्या टॅलेंटनुसार कामगिरी केली नाही. (T20 World Cup : Bowling coach Bharat Arun Dissatisfied with the bowlers performance)

भारतीय संघ आपला शेवटचा साखळी सामना सोमवारी नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पत्रकारांना सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळला नाही. दुबईत होणाऱ्या सामन्यांमध्ये नाणेफेकीला जास्त महत्त्व असले, तरी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला खूप फायदा होत आहे.

पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली नाही: भरत अरुण

भरत अरुण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी कोणतीही सबब देत नाही, पण या विश्वचषकात असे दिसून आले आहे की नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला खूप फायदा होतो, विशेषत: जेव्हा तुम्ही दुबईत खेळता तेव्हा. जेव्हा तुम्ही नंतर गोलंदाजी करता तेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे होते. हे एक निमित्त नाही, आपण अधिक चांगले प्रदर्शन केले पाहिजे. पहिल्या सामन्यात आम्हाला लक्ष्य वाचवण्याची संधी होती पण आमची गोलंदाजी सरासरी होती.

2 सामने गमावल्यानंतर भारताचे पुनरागमन

पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला आणि त्यानंतर स्कॉटलंडने दिलेले लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 39 चेंडूत गाठलं आणि सेमीफायनलच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. मात्र, टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहे. जर अफगाणिस्तानने या सामन्यात विजय मिळवल आणि त्यानंतर टीम इंडियाने नामिबियावर विजय मिळवला, तरच विराट आणि कंपनी सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल. किवी संघ उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्याने असे होणे कठीण आहे. पहिले दोन सामने गमावल्यामुळे टीम इंडिया अशा प्रकारे अडचणीत सापडली आहे.

इतर बातम्या

निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्वेन ब्राव्होकडून चाहत्यांना खुशखबर, महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा

T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?

पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट

(T20 World Cup : Bowling coach Bharat Arun Dissatisfied with the bowlers performance)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.