AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinesh Karthik | तामिळनाडूचा मराठी कोच दिनेश कार्तिकच्या नजरेत खुपला का? पराभवानंतर म्हणाला….

Dinesh Karthik | तामिळनाडूचा डाव 146 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमने 378 धावा केल्या. तामिळनाडूची टीम दुसऱ्याडावात 162 वर ऑलआऊट झाली. त्यामुळे रणजी ट्रॉफीमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. या पराभवानंतर तामिळनाडूचे कोच निराश झाले.

Dinesh Karthik | तामिळनाडूचा मराठी कोच दिनेश कार्तिकच्या नजरेत खुपला का? पराभवानंतर म्हणाला....
Dinesh Karthik-Sulkshan KulkarniImage Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2024 | 12:55 PM
Share

मुंबई : मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई आणि तामिळनाडूमध्ये रणजी ट्रॉफीची सेमीफायनल मॅच झाली. या मॅचमध्ये मुंबईने तामिळनाडूला एक डाव आणि 70 धावांनी धूळ चारली. या पराभवामुळे तामिळनाडूच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचण्याच स्वप्न भंग पावलं. मुंबईच्या टीमकडून झालेल्या मोठ्या पराभवामुळे तामिळनाडूच्या टीममधील अंतर्गत मतभेद समोर आलेत. तामिळनाडूचे कोच सुलक्षण कुलकर्णी यांनी कॅप्टन साई किशोरवर मोठा आरोप केलाय. साई किशोरच्या हेकेखोरपणामुळे तामिळनाडूचा पराभव झाला, असा सुलक्षण कुलकर्णी यांचा दावा आहे.

मुंबई विरुद्ध टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करायची हा संपूर्ण टीमचा निर्णय होता. पण साई किशोरने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली. परिणामी तामिळनाडूचा डाव 146 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमने 378 धावा केल्या. तामिळनाडूची टीम दुसऱ्याडावात 162 वर ऑलआऊट झाली. त्यामुळे रणजी ट्रॉफीमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.

कोचने काय म्हटलं?

या पराभवानंतर तामिळनाडूचे कोच निराश झाले. त्यांनी कॅप्टन साई किशोर विरोधात वक्तव्य केली. “मी नेहमी थेट बोलतो. आम्ही पहिल्यादिवशी सकाळी 9 वाजताच मॅच हरलो होतो. पीच पाहिल्यानंतर मला माहित होतं की, काय करायच आहे. सर्वकाही सेट होतं. टॉस आम्ही जिंकलेलो. मुंबईकर असल्यामुळे मला परिस्थिती माहिती होती. आम्ही गोलंदाजी करायला हवी होती. पण कॅप्टनचा इरादा वेगळाच होता. शेवटी मैदानात कॅप्टनच बॉस असतो. मी फक्त इनपुट देऊ शकतो” असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले.

7 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलेली टीम

तामिळनाडू कोचच्या या वक्तव्यावर दिनेश कार्तिक नाराज झाले. “तामिळनाडूच्या कोचची ही कृती योग्य नाहीय. त्याने कॅप्टनसोबत उभ राहिलं पाहिजे. त्याऐवजी ते कर्णधाराला पराभवासाठी जबाबदार ठरवत आहेत” असं दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर म्हटलं आहे. साई किशोरच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूची टीम 7 वर्षानंतर रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.