AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : निवड समितीकडून 3 वर्षांपासून नो एन्ट्री, बॉलर निवृत्तीच्या उंबरठ्यावर

Indian Cricket Team: आयपीएलमुळे टीम इंडियाला एकसेएक आणि तोडीसतोड खेळाडू मिळाले आहेत. या युवा खेळाडूंमुळे अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळणं दूर त्यांची निवडही होणं अशक्य होऊन बसलंय.

Team India : निवड समितीकडून 3 वर्षांपासून नो एन्ट्री, बॉलर निवृत्तीच्या उंबरठ्यावर
test team india
| Updated on: Aug 25, 2024 | 9:56 PM
Share

टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याआधी दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या दरम्यान रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून टीम इंडियाची युवाब्रिगेड ही टी 20i क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. हे युवा खेळाडू परिस्थिती आणि गरजेनुसार खेळत असल्याने निवडक खेळाडूंनी तिन्ही फॉर्मेटमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे अनेक अनुभवी खेळाडूंना संधी मिळणं अवघड होऊन बसलंय. अशात शिखर धवनंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्ती घेऊ शकतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा साडे तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून बाहेर आहे. त्यामुळे इशांत निवृत्ती जाहीर करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थिती पाहता इशांतची टीम इंडियात निवड होईल आणि त्यानंतर संधी मिळेल, असं वाटत तरी नाही. त्यामुळे इशांतचं कमबॅक जवळपास नाहीच्या बरोबर आहे. तसेच इशांतचं वय हे 35 इतकं आहे. त्यामुळे इशांतला खरंच संधी द्यावी का? हा मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे इशांतकडे निवृत्तीशिवाय कोणताही पर्याय नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, या आणि इतर गोलंदाजांनी आपलं स्थान भक्कम केलंय. त्यात गौतम गंभीर कोच झाल्यापासून प्रत्येक जण बॉलिंग करतोय. त्यामुळे इशांतच्या कमबॅकची आशा धुसरच आहे.

इशांतची क्रिकेट कारकीर्द

इशांत शर्माने टीम इंडियाचं 105 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. इशांतने कसोटीत 311 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 80 एकदिवसीय सामन्यात 115 विकेट्स मिळवल्या आहेत. तर 14 टी 20 सामन्यात अनुभवी गोलंदाजाने 8 विकेट्स मिळवल्या आहेत. ईशांतने 2007 साली कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानंतर इशांतने वनडे डेब्यू केलं. मात्र इशांतला 2016 नंतर एकदाही वनडे मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे इशांत शर्मा याने येत्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यास क्रिकेटच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणा्र नाही, हे मात्र निश्चित.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.