AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Retirement : विराट टी 20i, कसोटीनंतर आता वनडेतूनही निवृत्त होणार? गोलंदाज म्हणाला..

Virat Kohli Odi Cricket Retirement : विराट कोहली याने 2024 मधील वर्ल्ड कप फायनलमधील विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Virat Kohli Retirement : विराट टी 20i, कसोटीनंतर आता वनडेतूनही निवृत्त होणार? गोलंदाज म्हणाला..
Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Aug 21, 2025 | 7:57 PM
Share

टीम इंडियाच्या विराट कोहली याची क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. विराटने टी 20i नंतर अवघ्या काही महिन्यांपूर्वी कसोटी क्रिकेटलाही रामराम केला होता. आता विराट फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट अखेरचा एकदिवसीय सामना हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल निमित्ताने खेळला. त्यानंतर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. विराट कुटुंबियांसह वेळ घालवत आहे. विराटने काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत विराटची दाढी पांढरी पडल्याचं दिसत होतं. विराटच्या या पांढऱ्या दाढीवरुन चांगलीच चर्चा रंगली होती. विराटचं वय झालंय, आता तो वनडेतूनही रिटायर होईल,अशी चर्चा होती. आता विराटबाबत भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने प्रतिक्रिया दिली आहे.

“नाही, मला असं वाटत नाही. पांढरी आणि ग्रे दाढी हे नैसर्गिक आहे. त्यामुळे काय फरक पडणार आहे? खेळाडू तर तसाच राहिल. विराट भय्या निश्चित पुढे खेळत राहतील”, असा विश्वास नवदीप सैनी याने व्यक्त केला. नवदीप सैनी याने स्पोर्ट्स यारीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं. .

विराटने भारताचं टी 20I, वनडे आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मटेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने स्फोटक बॅटिंगने भारताला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला आहे. विराटने अनेक रेकॉर्ड केले आहेत. तसेच विराटने कॅप्टन म्हणूनही चमकदार कामगिरी केली आहे.

विराटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील कामगिरी

विराटने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या होत्या. विराटने 5 सामन्यांमध्ये 54.50 च्या सरासरीने 218 धावा केल्या. विराटने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

विराट कोहली आता मैदानात केव्हा उतरणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय मालिका होणार आहे. उभयसंघातील या 3 सामन्यांच्या मालिकेला 19 ऑक्टोबरपरपासून सुरुवात होणार आहे. विराट आणि रोहित शर्मा हे दोघेही फिट असल्यास ते या मालिकेत खेळतील हे निश्चित आहे.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?