AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Dravid : टी 20 क्रिकेटमधून रोहित-विराटची करिअर संपलं? द्रविडची हिंट

रोहित आणि विराटचं (Rohit Virat) टी 20 करियर संपलंय, अशी हिंट द्रविडने (Rahul Dravid) दिली.

Rahul Dravid : टी 20 क्रिकेटमधून रोहित-विराटची करिअर संपलं? द्रविडची हिंट
| Updated on: Jan 06, 2023 | 6:20 PM
Share

मुंबई : टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी टी 20 पासून दूर आहेत. त्यात आता हेड कोच राहुल द्रविडने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यानंतर विराट-रोहितबाबत मोठी हिंट दिली आहे. रोहित आणि विराटचं टी 20 करियर संपलंय, अशी हिंट द्रविडने दिली. हार्दिक पंड्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. (team india head coach rahul dravid give hint about rohit sharma and virat kohli t20i career)

राहुल द्रविड काय म्हणाला?

“टी 20 वर्ल्ड 2022 सेमीफायनलनंतर असे 3-4 खेळाडूच आहेत, जे श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत खेळत आहेत. पुढील टी 20 हंगामाबाबत आमचा विचार वेगळा आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी श्रीलंका विरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव राहिला. सध्या आमचं लक्ष्य हे आगामी वनडे वर्ल्ड कर आणि टेस्ट चॅम्पियनशीपवर आहे. त्यामुळे आमच्याकडे आता युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांना पारखण्याची वेळ आहे”, असं द्रविडने स्पष्ट केलं.

इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह खेळले होते. तेच आता श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतही खेळत आहेत. हे चारही खेळाडू श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात खेळले.

पांड्याच्या निर्णयाचं समर्थन

दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी फाग पाडलं. द्रविडने पांड्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं. “आम्ही काही विकेट्स लवकर गमावल्या. विकेट्स गमावल्या नसत्या तर परिस्थिती वेगळी असती. तिथे फार दवं होतं, ज्यामुळे श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांना त्यांच्या कोट्यातील सर्व ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. पिचकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय योग्य होता. आम्ही आणखी चांगली कामगिरी केली असती तर निकाल आणखी आला असता”, असंही द्रविडने स्पष्ट केलं.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.