AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant : ऋषभ पंत याचा झालाय दुसरा जन्म, नेमका काय प्रकार जाणून घ्या!

ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंड येथे झाला होता. अशातच त्याने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.

Rishabh Pant : ऋषभ पंत याचा झालाय दुसरा जन्म, नेमका काय प्रकार जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 28, 2023 | 10:26 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत सध्या क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. मागच्या वर्षी ऋषभ पंतचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात त्याला जबर मार लागला होता. अपघातानंतर ऋषभ पंत वेगाने रिकव्हर होत असून सध्या तो नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) मध्ये वॉकरच्या मदतीने चालत आहे. अपघातानंतर ऋषभ पंतचं आयुष्य बदलून गेलंय. यातच आता त्याने त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.

अपघातानंतर पंतच्या जीवनात अनेक बदल झाले आहे. यातच त्याने एक मोठा निर्णय घेवून सर्वांनाच धक्का दिला आहे. ऋषभ पंतचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तराखंड येथे झाला. पण त्याने अपघातानंतर आपल्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये बदल गेला आहे.

सोशल मीडियावर इन्स्टाच्या बायोमध्ये जन्मतारीख बदलून 1 जानेवारी 2023 केलीये. ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी भयंकर अपघात झाला होता. अपघातनंतर त्याच्या पुढील करिअरवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत, त्याचं करिअर संपल्याचे सांगितले जात होतं. पण ऋषभ पंत आता जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

ऋषभ पंत दिल्लीहून त्याच्या गावी जाण्यासाठी स्वतः चार चाकी गाडी चालवत निघाला होता. त्यातच त्याचा देहराडून जवळ 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. या भयंकर अपघातात पंतच्या गाडीला आग लागून, पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला देहराडून येथील हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुखापत गंभीर असल्याने त्याला एअरलिफ्ट करुन मुंबईला हलवण्यात आले. पंतवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पंत मागच्या काही दिवसांपासून नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये आहे.

दरम्यान, ऋषभ पंतने 2022 साल गाजवत टिमसाठी चांगले प्रदर्शन केले होते. त्याने टिम इंडियासाठी 7 मॅच खेळत 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या होत्या.

Follow Us
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा