AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: भारताच्या युवा खेळाडूच दु:ख, बोलला, इतक्या धावा केल्या, पण तरीही लोक चांगलं नाही बोलतं

कोण आहे तो खेळाडू? त्याला असं का वाटतं?

Team India: भारताच्या युवा खेळाडूच दु:ख, बोलला, इतक्या धावा केल्या, पण तरीही लोक चांगलं नाही बोलतं
team india
| Updated on: Sep 22, 2022 | 2:47 PM
Share

मुंबई: टीम इंडियामध्ये अलीकडच्या काळात अनेक युवा क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली. त्यात काही आपली छाप उमटवण्यात यशस्वी ठरले. काहींना संधी मिळूनही कौशल्य दाखवता आलं नाही. म्हणून ते अपयशी आहेत, असं म्हणता येणार नाही. अशाच युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंमध्ये ऋतुराज गायकवाडचा समावेश होतो. ऋतुराज गायकवाड मूळचा पुण्याचा. आयपीएलमध्ये तो एमएसधोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. आयपीएलमध्येच सर्वप्रथम त्याचं कौशल्य दिसून आलं.

टीम इंडियासाठी किती सामने खेळलाय?

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची टॅलेटेड क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. मागच्यावर्षी आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 25 वर्षाचा ऋतुराज टीम इंडियासाठी नऊ सामने खेळलाय. त्याला फक्त टी 20 फॉर्मेटमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

कधी डेब्यु केला?

ऋतुराजने नऊ टी 20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये 135 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. त्याने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये टी 20 डेब्यु केला होता.

यावर्षी आयपीएलमध्ये किती धावा केल्या?

ऋतुराजने आयपीएल 2020 मध्ये डेब्यु केला. त्या सीजनमध्ये तो एकूण सहा सामने खेळला. त्याने एकूण 204 धावा केल्या. 2021 च्या सीजनमध्ये त्याने एक सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरी झळकावल्या. त्याने 635 धावा केल्या. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने तीन अर्धशतकांच्या मदतीने एकूण 368 धावा केल्या.

मुख्य लक्ष्य काय?

“मी निकष ठरवलेत. यात चढ-उतार होत राहणार. व्यक्ती, खेळाडू आणि क्रिकेटर म्हणून मी प्रगती करत राहीन. मुख्य लक्ष्य सतत स्वत:मध्ये सुधारणेच आहे” असं ऋतुराज म्हणाला.

ऋतुराज काय म्हणाला?

देशातंर्गत क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राकडून खेळतो. “तुम्ही माझा मागचा दोन वर्षांचा रेकॉर्ड पाहिला, तर मी त्यात खूप काही मिळवलय. मी जितक्या धावा केल्यात, त्यावरुन तुम्ही माझं आकलन करु शकत नाही. कारण त्यात चढ-उतार होत असतात. आयपीएमध्ये मी आधी 635 धावा केल्या. त्यानंतरच्या सीजनमध्ये 400 रन्स केल्या. पण तरीही लोक म्हणतात माझ्यासाठी आयपीएल सीजन चांगला नव्हता” असं ऋतुराज म्हणाला.

न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज

ऋतुराजला खेळाडू म्हणून सतत स्वत:मध्ये सुधारणा करायची आहे. गायकवाड भारतीय ‘ए’ टीमचा भाग आहे. गुरुवारपासून चेन्नईच्या स्टेडियमवर न्यूझीलंड ‘ए’ विरुद्ध तीन वनडे सीरीजची सुरुवात होणार आहे. ऋतुराजने न्यूझीलंड ए विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावलं. पुढच्या डावात अवघ्या 6 धावांनी शतकाची संधी हुकली.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत