AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : टीम इंडियाला मोठा झटका;जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही!

Jasprit Bumrah Asia Cup 2025 : बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचा थरार हा 9 ते 28 सप्टेंदरम्यान यूएईमध्ये रंगणार आहे. या स्पर्धते एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या.

Asia Cup 2025 : टीम इंडियाला मोठा झटका;जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही!
Jasprit Bumrah Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 02, 2025 | 8:11 PM
Share

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवशी रिलीज करण्यात आलं. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली. वर्कलोड मॅनेजमेंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता जसप्रीत बुमराहबाबत काही तासांत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही, असा दावा केला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, बुमराह आशिया कप स्पर्धा किंवा विंडीज विरूद्धची कसोटी मालिका यापैकी एकाचीच निवड करेल, असं म्हटलं जात आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर टीम इंडिया विंडीज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

आशिया कपमध्ये बुमराह खेळणार नाही?

आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना हा 29 सप्टेंबरला होणार आहे. तर भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळल्यास तो विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. “बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळला आणि भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचली तर तो हा सामना आणि कसोटी मालिकेपैकी कशाला प्राधान्य देणार? हा प्रश्न उपस्थित केला जाईल”, असं सूत्राने म्हटलं.

सूत्राने काय म्हटलं?

“बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळल्यास त्याला 1 महिन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराह त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसू शकतो. याबाबतचा निर्णय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर घेतील. हा निर्णय फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बुमराहचा टेस्ट क्रिकेट आवडता फॉर्मेट आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत पॉइंट्स मिळवणंही संघासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी संघात बुमराह असणं महत्त्वाचं आहे. तसेच बुमराह नववर्षात न्यूझीलंड विरुद्ध टी 20i मालिका खेळू शकतो”, असंही सूत्रांनी म्हटलं.

बुमराहची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

बुमराह इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनजमेंटमुळे कसोटी मालिकेत 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळला. बुमराहने या 3 सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने एकूण 14 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?