AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी वीरेंद्र सेहवाग हवा, सोशल मीडियावर एकच चर्चा!

विराट कोहली असताना सेमी फायनल, फायनलमधील सामने भारताने गमावले होते. टीम मॅनेजमेंटने बदल म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवलं.  मात्र तरीही काही मोठी कामगिरी संघाला करता आली नाही. 

Team India : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी वीरेंद्र सेहवाग हवा, सोशल मीडियावर एकच चर्चा!
| Updated on: Jun 12, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई : टीम इंडियाची गेली 10 वर्षातील कामगिरी पाहता बाद फेरीमध्ये मुख्य खेळाडू सपशेल फेल जाताना दिसत आहेत.  गेल्या 10 वर्षात संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केलेला पण त्यानंतर मोक्याच्या क्षणी संघ नांगी टाकत आहे. विराट कोहली असताना सेमी फायनल, फायनलमधील सामने भारताने गमावले होते. टीम मॅनेजमेंटने बदल म्हणून कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवलं.  मात्र तरीही काही मोठी कामगिरी संघाला करता आली नाही.

टी-20 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधील झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार बदलण्यापेक्षा संघ महत्त्वाच्या सामन्यात का अयशस्वी ठरत आहे? याचा उत्तर शोधणं गरजेचं आहे. जो संघ साखळी फेरीत एकदम दर्जेदार खेळ करत आलेला असतो त्याच संघाची मेन सामन्यामध्ये दाणादाण कशीकाय उडते? संघातील खेळाडूंवर दडपण येत आहे का?

100 पेक्षा जास्त सामने खेळण्याच्या अनुभव असलेले खेळाडूही बाद होत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली तर फायनल आणि सेमीफायनलसारख्या मॅचमध्ये फ्लॉप जात आहेत. दडपण घेण्यापेक्षा बिंधास्त खेळले तर निकाल कदाचित वेगळा लागू शकतो. फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवाग याला कोच करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केलीय.

दरम्यान, वीरेंद्र सेहवागची फलंदाजी करण्याची स्टाईल सर्वांनाच माहिती आहे. समोर कोणताही बॉलर असूदेत अजिबात दडपण न घेता त्याने फलंदाजी केली आहे. अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज टीम इंडियाला आहे. त्यामुळे सेहवागला कोच करण्यात यावं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.