AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजपेक्षा वाईट स्थिती, पाचव्यांदा असं काही घडलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्याच दिवशी निराशाजनक कामगिरी केली. संपूर्ण संघ 185 धावांवर बाद झाला. यासह टीम इंडियाने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजपेक्षा वाईट स्थिती, पाचव्यांदा असं काही घडलं
| Updated on: Jan 03, 2025 | 8:36 PM
Share

कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड मालिकेपूर्वी भारताचा दबदबा होता. पण न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मालिकेत भारताची पुरती वाट लागली आहे. न्यूझीलंडने भारतात येऊन व्हाईट वॉश दिल्याची प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. तर ऑस्ट्रेलियातही टीम इंडियाची सुमार कामगिरी राहिली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी दोनदा गाठणाऱ्या टीम इंडियाच्या वाटेला असं अपयश आलं आहे. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाला ग्रहण लागल्यासारखं वाटत आहे. कोणतीच बाब टीम इंडियाच्या पथ्यावर पडताना दिसत नाही. वनडे मालिकेतही श्रीलंकेने दारूण पराभव केला होता. असं असताना कसोटीत टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. टीम इंडिया 2023 नंतर एका नकोशा विक्रमासह टॉपवर आहे. टीम इंडिया बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी घेतली. कौल जिंकला आणि टीम इंडियाने एका नकोशा विक्रमला गवसणी घातली.

टीम इंडिया पहिल्या डावात पहिल्याच दिवशी 185 धावांवर बाद झाली. 2023 नंतर ही पाचवी वेळ जेव्हा टीम इंडिया 200 धावांचा आत बाद झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीवर बोट ठेवलं जात आहे. या उलट गोलंदाजीत टीम इंडिया चांगली कामगिरी करत असल्याचं दिसत आहे. 2023 या वर्षानंतर कसोटीतील पहिल्या डावात 200 आत बाद होण्याचा विक्रम आता भारताच्या माथ्यावर कोरला गेला आहे. भारताने 5 वेळा, वेस्ट इंडिज 3 वेळा, अफगाणिस्तान 3 वेळा, बांग्लादेश 3 वेळा आणि दक्षिण अफ्रिका 3 वेळा बाद झाली आहे.

दरम्यान, सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 9 धावांवर 1 गडी गमवला आहे. दुसऱ्या दिवशी इतर खेळाडूंना झटपट बाद करण्याचं आव्हान आहे. जर ऑस्ट्रेलियाने 185 धावांची मजल ओलांडली आणि 100 हून अधिक धावांची आघाडी घेतली तर टीम इंडियाला विजय मिळवणं कठीण जाणार आहे. जर टीम इंडियाचा पराभव झाला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी आणि मालिका दोन गमवावी लागणार आहे.

Follow Us
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल
शिंदेंचं नाव का वगळं? जाब विचारण्यसाठी शिवसैनीक थेट पालिकेत दाखल, काय मिळालं उत्तर?
वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन
मोठी बातमी! मनोरंजन विश्व हादरलं; वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेत्री संचिता उगालेने संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसल
महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच... इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?
संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; ठाकरेंचा भाजपला सल्ला
Sharmila Thackeray | आमची पोरं कशाला चोरता, संघ, विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांना घडवा; शर्मिला ठाकरेंचा भाजपला सल्ला
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस उपस्थित
शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी CM फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार शाळांमध्ये उपस्थित
सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण...; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत