AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपांत्य फेरीसाठी अडसर ठरलेल्या संघाविरुद्ध टीम इंडिया वनडे मालिका खेळणार,बीसीसीआयची माहिती

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीचं गणित आता जर तरवर अवलंबून आहे. पण भारतावर अशी वेळ आली ती पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे.. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारूण पराभव केला. त्यामुळे सर्व गणित फिस्कटलं होतं. आता भारत न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज आहे.

उपांत्य फेरीसाठी अडसर ठरलेल्या संघाविरुद्ध टीम इंडिया वनडे मालिका खेळणार,बीसीसीआयची माहिती
Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 14, 2024 | 5:36 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणित जर तरवर आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यावर आता पुढचं गणित असणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं तर भारताचे उपांत्य फेरीचे दरवाजे उघडतील. पण पाकिस्तानची स्पर्धेतील कामगिरी पाहून असं शक्य होईल असं वाटत नाही. तरीही जर तरच्या गणितावर क्रीडाप्रेमी आशा लावून बसले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारताने फक्त 9 धावांनी गमावला. खरं तर या सामन्यावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित ठरणार होतं. पण भारताच्या पदरी निराशा पडली. कर्णधार हरमनप्रीत कौरची खेळी व्यर्थ गेली. असं असताना बीसीसीआयकडू एक घोषणा करण्यात आली आहे. टी20 वर्ल्डकप संपताच भारतीय क्रीडारसिकांना आणखी एका मालिकेची मेजवानी मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. बीसीसीआयने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

पहिला वनडे सामना 24 ऑक्टोबर, दुसरा वनडे सामना 27 ऑक्टोबर आणि तिसरा वनडे सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्याचं नेतृत्व कोणाकडे सोपवलं जाणार याची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे या मालिकेसाठी कोणता संघ असेल याबाबत आतापासून चर्चांना उधाण आलं आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यास अपयशी ठरला तर संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत दोन्ही संघात 55 वनडे सामने झाले आहेत. 34 सामने न्यूझीलंडने आणि 20 सामने भारताने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. शेवटच्या सामन्यांचा निकाल पाहिला तर न्यूझीलंडचा वरचष्मा दिसला आहे. न्यूझीलंडने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचं पारडं भारताच्या तुलनेत जड वाटत आहे.

Follow Us
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
Nashik Gite Vs Darade Rada | दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण सरदेसाई, 15 कोटी अन् बरंच काही...
नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
Nagpur Vidhan Parishad Result | नागपुरात भाजपचा झेंडा फडकला; राजीव पोतदार विजयी, काँग्रेसला मोठा धक्का
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराड
अखेर तेच घडलं! नाशिकमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये बिनसलं; नरेंद्र दराडे म्हणाले, शिंदेच...
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय
Nashik Gokul Gite | नाशिकमध्ये राजकीय भूकंप! अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा मोठा विजय, महायुतीला धक्का
अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात...
tv9 Marathi Special Report | अखेर ठरलं! ओमराजे निंबाळकरांचा ठाकरे गटाला रामराम, शिंदे गटात प्रवेश निश्चित
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!
Nagpur Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात!; महायुतीचे वर्चस्व कायम राहणार की उलटफेर होणार?
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग