AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशमधील आंदोलनाचा क्रिकेटलाही फटका, ICC घेणार मोठा निर्णय

बांगलादेशमधील परिस्थिती नाजूक आहे. आंदोलनात ३०० हून अधिक लोकं मारली गेली आहे. पंतप्रधानांना पद सोडावे लागले आहेत. इतकंच नाही तर देश देखील सोडावा लागला आहे. आता याचा क्रिकेला ही मोठा फटका बसणार आहे. आयसीसी यावर बारीक नजर ठेवून आहे.

बांगलादेशमधील आंदोलनाचा क्रिकेटलाही फटका, ICC घेणार मोठा निर्णय
| Updated on: Aug 06, 2024 | 12:30 AM
Share

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांना देशही सोडावा लागला आहे. आता लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. या राजकीय घडामोडीचा परिणाम क्रिकेटवर देखील होणार आहे. त्यामुळे बांगलादेशकडून महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद हिरावून घेतले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, परंतु राजकीय परिस्थितीमुळे या स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. या स्थितीत बांगलादेशच्या भूमीवर टी-20 विश्वचषक आयोजित करणे शक्य नसल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत महिला टी-20 विश्वचषक श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण ICC लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते असे मानले जात आहे.

बांगलादेशच्या इतिहासात लष्कराने सत्ता काबीज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1975 मध्येही लष्कराने तेथील सत्ता काबीज केली होती. त्यावेळी देशात शेख मुजीबुर रहमान यांचे सरकार होते. शेख मुजीबुर रहमान हे शेख हसीनाचे वडील होते. त्या काळात जेव्हा लष्कराने देशाची सत्ता काबीज केली होती, तेव्हा लष्कराने बांगलादेशवर सुमारे 15 वर्षे राज्य केले.

शेख हसीना यांचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर थांबले आहे. दरम्यान, आज भारतातील पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास सीसीएसची बैठक झाली. जिथे परराष्ट्र मंत्री आणि NSA यांनी बांगलादेशातील प्रत्येक परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली आहे. आता शेख हसीनाचे विमान हिंडन एअरबेसवरून कुठे जाणार हे स्पष्ट झालेले नाही.

शेख हसीना यांच्या जाण्याने दक्षिण आशियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात, विशेषत: चीनचा वाढता प्रभाव आणखी मजबूत होऊ शकतो, जे भारतासाठी मोठे आव्हान आहे. उदाहरणार्थ, चीन तिस्ता सिंचन प्रकल्पावर डोळा ठेवून होता, पण भारताने त्यात सहकार्याचा प्रस्ताव दिल्याने शेख हसीना यांनी आपली धोरणे बदलली.

प्रकल्पाचे स्थान सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ आहे, जे भारतासाठी धोरणात्मक डोकेदुखी आहे. हा कॉरिडॉर चिकन्स नेक म्हणून ओळखला जातो, जो ईशान्येला रस्त्याने जोडण्याचा एकमेव मार्ग आहे.

तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?.
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर.
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन.
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.