वैभव सूर्यवंशीचं खतरानक स्वप्न, गोलंदाजांनाही फुटेल घाम; 20 वर्षात… नेमकं काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशी हा अवघ्या 15 वर्षांचा आहे. यंदाचा आयपीएल तो राजस्थान रॉयल्स या संघाकूडन खेळला. याच राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स या सोशल मीडियाव चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या वैभव त्याची फलंदाजी आणि त्याचं क्रिकेटमधील करिअर याविषयी तो बोलला आहे.

वैभव सूर्यवंशीचं खतरानक स्वप्न, गोलंदाजांनाही फुटेल घाम; 20 वर्षात... नेमकं काय म्हणाला?
VAIBHAV SURYAWANSHI
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2026 | 3:34 PM

Vaibhav Suryawanshi : भारताचा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने कमाल करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये त्याने धावांचा अक्षरश: पाऊस पाडून दाखवला. त्याच्या याच तुफानी फलंदाजीमुळे त्याचा यावेळी भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. आता वैभव सूर्यवंशी हा आयर्लंड-इंग्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा भाग असेल. वैभव सूर्यवंशी आता भारताकडून खेळतानादेखील मोठी कमाल करून दाखवणार असल्याचा दावा त्याचे चाहते करत आहेत. दरम्यान, त्याच्या फलंदाजीची सगळीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे त्याचा मुलाखतीमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आगामी 20 वर्षांचा त्याचा क्रिकेटविषयीचा प्लॅन रेडी आहे. त्याचे भविष्याचे नियोजन ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.

मी भविष्यात जोपर्यंत क्रिकेट खेळेन तोपर्यंत…

वैभव सूर्यवंशी हा अवघ्या 15 वर्षांचा आहे. यंदाचा आयपीएल तो राजस्थान रॉयल्स या संघाकूडन खेळला. याच राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स या सोशल मीडियाव चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या वैभव त्याची फलंदाजी आणि त्याचं क्रिकेटमधील करिअर याविषयी तो बोलला आहे. मला असं क्रिकेट खेळायचं आहे की, ते पाहून हा प्लेअर एकटाच सामना जिंकून देऊ शकतो, असे लोक म्हणाले पाहिजेत, असं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. “मी भविष्यात जोपर्यंत क्रिकेट खेळेन तोपर्यंत मला खूप क्रिकेट खेळायचं आहे. माझा खेळ पाहून हा प्लेअर एकटाच मॅच जिंकून देऊ शकतो, असं लोक मला म्हणाले पाहिजेत. माझा दबदबा राहिला पाहिजे. त्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे,” असे वैभव सूर्यवंशीने आपल्या या मुलाखतीत म्हटलेले आहे.

दबदाब पुढच्या 10 ते 20 वर्षांपर्यंत राहिला पाहिजे

मी आलो, खेळलो आणि सामना संपला, असा खेळ मला खेळायचा नाही. माझ्या खेळण्याचा दबदाब हा पुढच्या 10 ते 20 वर्षांपर्यंत राहिला पाहिजे. मला क्रिकेट खेळायला चांगले वाटते म्हणूनच मी ते खेळत राहिलो. क्रिकेट खेळत खेळत मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, असेही वैभव सूर्यवंशी म्हणाल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता वैभव सूर्यवंशी आपल्या भारतीय संघासाठी नेमकी काय कामगिरी करू शकतो, ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us