AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy: Ruturaj Gaikwad चा झुंजार खेळ, पण महाराष्ट्राची टीम फायनल हरली

Vijay Hazare Trophy: सलग तीन शतकं झळकवणाऱ्या Ruturaj Gaikwad च्या बळावर महाराष्ट्राच्या टीमने फायनलमध्ये प्रवेश केला होता.

Vijay Hazare Trophy: Ruturaj Gaikwad चा झुंजार खेळ, पण महाराष्ट्राची टीम फायनल हरली
Saurashtra TeamImage Credit source: instagram
| Updated on: Dec 02, 2022 | 5:58 PM
Share

अहमदाबाद: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा आज अंतिम सामना झाला. महाराष्ट्र आणि सौराष्ट्रची टीम आमने-सामने होती. महाराष्ट्राने पहिली बॅटिंग केली. कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या झुंजार (108) शतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने 9 बाद 248 धावा केल्या. सौराष्ट्राने 46.3 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. सौराष्ट्राच्या टीमने महाराष्ट्रावर 5 विकेट आणि 21 चेंडू राखून विजय मिळवला.

सौराष्ट्राची दमदार सलामी

महाराष्ट्राने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्राने दमदार सुरुवात केली. हार्विक देसाई आणि शेल्डन जॅक्सनच्या जोडीने 125 धावांची सलामी दिली. हार्विकला बोल्ड करुन मुकेश चौधरीने ही जोडी फोडली. हार्विकने (50) धावा केल्या. त्यानंतर जय गोहीलला लगेचच मुकेश चौधरीने शुन्यावर बाद केलं.

जॅक्सन-चिराग जोडीकडून विजयावर शिक्कामोर्तब

त्यानंतर ठराविक अंतराने सौराष्ट्राचे फलंदाज बाद झाल्याने त्यांचा डाव अडचणीत येईल असं वाटलं होतं. पण चिराग जानी आणि शेल्डन जॅक्सनने नाबाद 57 धावांची भागीदारी करुन विजयावर शिक्कामोर्तब केलं. शेल्डनने 136 चेंडूत नाबाद 133 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 5 षटकार आहेत. चिरागने 25 चेंडूत नाबाद 30 धावा करताना 3 चौकार लगावले.

फायनलमध्ये ऋतुराजचा तोच अंदाज 

आज सौराष्ट्राविरुद्ध फायनल मॅचमध्येही ऋतुराजचा तोच अंदाज पहायला मिळाला. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये महाराष्ट्राकडून शतक ठोकलं. या टुर्नामेंटमधील मागच्या 5 इनिंग्समधील त्याने झळकावलेलं सलग तिसरं शतक आहे. या टुर्नामेंटमध्ये ऋतुराज गायकवाड भन्नाट फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऋतुराजने 131 चेंडूत 108 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 4 षटकार आहेत.

फायनलमध्ये हॅट्रिक

आज विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये हॅट्रिक पहायला मिळाली. सौराष्ट्राचा गोलंदाज चिराग जानीने ही हॅट्रिक घेतली. चिराग जानीने महाराष्ट्राविरुद्ध 10 ओव्हर्समध्ये 43 धावा देऊन 3 विकेट काढल्या. त्याला हॅट्रिकच्या बळावर हे तिन्ही विकेट मिळाले. त्याची ही व्यक्तीगत शेवटची ओव्हर होती. महाराष्ट्राच्या इनिंगमधील 49 व्या षटकात ही हॅट्रिक झाली. त्याने एसएस नवालेला आधी आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हंगरगेकर आणि तिसऱ्या चेंडूवर ओस्तवालची विकेट काढली. महाराष्ट्राच्या लोअर ऑर्डरमधील फलंदाजांचे हे तिन्ही विकेट होते.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!