AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विराट कोहलीचं तसं वागणं पाहून चाहतेही चक्रावले! नेमकं काय झालं ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून दुसऱ्या सामन्यासाठी संपूर्ण संघ कानपूरमध्ये पोहोचला आहे. असं असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

Video : विराट कोहलीचं तसं वागणं पाहून चाहतेही चक्रावले! नेमकं काय झालं ते जाणून घ्या
| Updated on: Sep 25, 2024 | 3:20 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कानपूरला पोहोचले असून खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. खासकरून विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. पण विराट कोहलीचं एक वाक्य चाहत्यांच्या थेट हृदयाला भिडलं आहे. खरंच विराट कोहली असं बोलला का? याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चाहता विराट कोहलीला फूलांचा गुच्छ देत आहे. तसचे दुसरा चाहता त्याला हात मिळवण्याचा प्रयत्नात होता. पण विराट कोहलीने लगेच सांगितलं की, सर माझे दोनच हात आहेत. इतकंच तर विराटने फुलांचा गुच्छ दुसरंच कोणाच्या तरी हाती सोपवतो आणि निघून जातो. पण जेव्हा विराट कोहलीने फुलांचा गुच्छ हाती घेतला तेव्हा त्याच्या दुसऱ्या हातात टॅब होता. त्यामुळे त्याला तसं करणं शक्य झालं नाही.

विराट कोहलीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्याच्या बहुतांश चाहत्यांना त्याची ही बाब आवडली नाही. इतकंच काय ट्रोलर्संनी विराट कोहलीवर टीका करण्यासही सुरुवात केली आहे. एका चाहत्याने सांगितलं की ‘पैसा आल्यानंतर सर्वच स्वत:ला देव समजू लागतात.’  तर दुसऱ्या चाहत्याने सांगितलं की, प्रत्येकाला हात मिळणवं काही होत नाही. त्याच्या दुसऱ्या हातात टॅब असल्याने त्याने नकार दिला आहे, असं दिसतंय.

विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून भारताऐवजी विदेशात राहणं पसंत करताना दिसत आहे. विराट कोहली मुलगा अकायच्या जन्माआधीपासून लंडनमध्ये राहात होता. त्यानंतर टी20 वर्ल्डकप खेळला आमि नंतर जेतेपद जिंकल्यानंतर थेट लंडनला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा भारतात आला आणि पुन्हा लंडनमध्ये गेला. विराट कोहली भारतात कमी आणि लंडनमध्येच अधिक राहात असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. पण लंडनमध्ये शिफ्ट झाला की नाही याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. पण विराट, अनुष्का आणि त्यांची मुलं आता लंडनमध्येच राहात आहेत.

विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रस्त्यावर मोकळेपणाने चालणं, शॉपिंग करणं आता होत नाही. भारतात रस्त्यावर चालणं तर खूपच कठीण आहे. विराट कोहलीच्या एकच झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. तर तो रस्त्यावर चालताना दिसला तर काहीच सांगायला नको. पण लंडनमध्ये विराट कोहली मनमोकळेपणाने रस्त्यावर फिरताना दिसला. तसेच सामान्य लोकांप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये खात होता. शॉपिंग करताना त्याला पाहिलं गेलं आहे.

Follow Us
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.