AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli ने क्रिकेट विश्वात रचला इतिहास तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अशी प्रतिक्रिया

World cup 2023 : क्रिकेट इतिहासात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने नवा विक्रम केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ५० शतके पूर्ण केले आहे. विराटने सचिन तेंडुलकर याचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. या नंतर संपूर्ण जगातून विराटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींनी ही त्याचे कौतूक केले आहे.

Virat Kohli ने क्रिकेट विश्वात रचला इतिहास तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अशी प्रतिक्रिया
MODI ON KOHLI
| Updated on: Nov 15, 2023 | 8:27 PM
Share

WORLD CUP 2023 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारत सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने 50 वे शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विश्वविक्रम मोडला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिनसह हजारो क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत त्याने हे त्याचं शतक साजरे केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केले. अनुष्का शर्माने देखील त्याच्या या शतकीय खेळीनंतर फ्लाईंग किस करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं.

विराट कोहली आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ शतकांचा रेकॉर्ड आहे. या कामगिरीसाठी खुद्द सचिन तेंडुलकर याने उभे राहून त्याचे अभिनंदन केले.

शतक पूर्ण केल्यानंतर त्याने सचिन तेंडुलकरबद्दल देखील आदर व्यक्त केला. सोशल मीडियावर विराट कोहलीचे कौतूक होत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता त्याच्या या शतकीय खेळीवर आनंद व्यक्त करत आहे.

२०१५ च्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली आणि टीम इंडियाची कामगिरी खराब झाली होती. संघाच्या पराभवानंतर लोकांनी अनुष्का शर्माला देखील सोशल मीडियावर खूप ट्रोल केले आणि भारतीय संघाच्या पराभवासाठी तिला जबाबदार धरले होते.

विराट कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी खेळली. ऐतिहासिक शतकासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोहलीचे अभिनंदन केले आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 117 आणि श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. या दोघांशिवाय शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या. श्रेयस अय्यरने अवघ्या 70 चेंडूत 105 धावा केल्या. अय्यरने 67 धावांवर आपले शतक पूर्ण केले. आयसीसी विश्वचषक नॉकआऊट सामन्यांच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.