Virat Kohli भयंकर कंटाळलाय, त्याला विश्रांतीची गरज; Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य

विराट कोहली (Virat Kohli IPL 2022) आयपीएल 2022 मध्ये आपल्या वाईट फॉर्मशी झगडत आहे. 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला खेळातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Virat Kohli भयंकर कंटाळलाय, त्याला विश्रांतीची गरज; Ravi Shastri यांचं मोठं वक्तव्य
Virat Kohli Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:56 AM

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli IPL 2022) आयपीएल 2022 मध्ये आपल्या वाईट फॉर्मशी झगडत आहे. 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहलीला खेळातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री म्हणाले की, बायो बबलच्या निर्बंधांदरम्यान, खेळाडूंची काळजी घेतली पाहिजे. रवी शास्त्री यांनी कबूल केले की विराट कोहलीमध्ये अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि त्याच्यावर जास्त जोर न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी (India’s Tour Of England) कोहलीला विश्रांती देण्यात यावी, असे शास्त्री म्हणाले. सततच्या टीका आणि अपेक्षांच्या ओझ्याने तो थकला आहे

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, ‘मी प्रशिक्षक असताना हे सर्व सुरू झाले. तुम्हाला खेळाडूंबद्दल सहानुभूती असायला हवी, हे मी पहिल्यांदा म्हणालो. जर तुम्ही आग्रह धरला तर केवळ नुकसानच होईल. अशा काळात खेळाडूने हार मानणे आणि शानदार कामगिरी करणे यामधील एक अतिशय बारीक रेषा असते. त्यामुळे तुम्हाला खूप समज दाखवावी लागेल.”

‘कोहलीला विश्रांतीची गरज’

रवी शास्त्री म्हणाले की, मी थेट भारताच्या प्रमुख खेळाडूबद्दल बोलत आहे. विराट कोहली भयंकर कंटाळलाय. जर टीम इंडियात कोणाला विश्रांतीची नितांत गरज असेल तर तो विराट आहे. दोन महिने असो किंवा दीड महिना, इंग्लंड दौऱ्यापूर्वी असो वा नंतर, त्याला ब्रेक मिळायलाच हवा. त्याला विश्रांतीची गरज आहे कारण त्याच्यात अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. आपण असा क्रिकेटपटू गमावू इच्छित नाही. अशा परिस्थितीतून जाणारा तो एकटा नाही. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अशी एक-दोन नावे असू शकतात. तुम्हाला समस्येचा सामना करावा लागेल.

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या. त्याने आरसीबी आणि टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे पण त्यामुळे त्याच्या खेळात काही विशेष फरक दिसून आला नाही. त्याला या मोसमात सात सामन्यांत 19.83 च्या माफक सरासरीने 119 धावा करता आल्या आहेत.

इतर बातम्या

IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

LSG vs RCB IPL 2022: रवीना टंडनच्या अदांनी केलं घायाळ, KGF 2 ची टीम डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.