AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy : पाच फिरकीपटूंना दुबईत घेऊन जाण्याचं कारण काय? वरुणची संघात निवड होताच अश्विनने विचारला प्रश्न

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाकडून फार अपेक्षा आहेत. मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताला पराभवाची धूळ चारली होती. आता भारताकडून परतफेडीची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आणि यशस्वी जयस्वालला बसल्यानंतर नव्याने संघ जाहीर केला आहे. या संघावर आर अश्विनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Champions Trophy : पाच फिरकीपटूंना दुबईत घेऊन जाण्याचं कारण काय? वरुणची संघात निवड होताच अश्विनने विचारला प्रश्न
| Updated on: Feb 14, 2025 | 8:29 PM
Share

टीम इंडियाने इंग्लंडला वनडे मालिकेत लोळवल्यानंतर आता चॅम्पियन ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ झाली. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेला मुकला. तर यशस्वी जयस्वालला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निवड समितीने जसप्रीत बुमराहच्या जागी हार्षित राणा, तर यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे. वरुण चक्रवर्तीला संघात घेतल्याने आता भारतीय संघात पाच फिरकीपटू झाले आहे. पाच फिरकीपटूंची खरंच टीम इंडियाला गरज आहे का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, या प्रकरणात आता माजी फिरकीपटू आर अश्विनने देखील उडी घेतली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. भारताचे सर्व सामना दुबईत होणार आहेत. भारताने उपांत्य आणि अंतिम फेरीत प्रवेश केला तर हे सामनेही दुबईत होतील.

दुबईची खेळपट्टी ही फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे निवड समितीने असा निर्णय घेतला असावा. पण फिरकीपटू आर अश्विनला यात तसं काही वाटत नाही. आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘मला नेमकं कळत नाही की आपण दुबईत किती फिरकीपटू घेऊन चाललो आहोत. पाच फिरकीपटू आणि आम्ही यशस्वी जयस्वालला बाहेर केलं. मला जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत एका दौऱ्यासाठी आम्ही तीन ते चार फिरकीपटू घेऊन जातो. पण दुबईत पाच फिरकीपटू? मला कळत नाही. मला वाटतं आपल्याकडे दोन किंवा एक फिरकीपटू जास्त आहे.’

‘फिरकीपटूंना दुबईत नेण्यात काय अर्थ आहे? दोन डावखुरे फिरकीपटू सर्वश्रेष्ठ अष्टपैलू आहेत. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दोघंही खेळणार आहेत. हार्दिक आणि कुलदीप यादवही खेळणार आहे. जर वरुण चक्रवर्ती संघात हवा असेल तर एका वेगवान गोलंदाजाला बसवावं लागेल. तसेच हार्दिक पांड्याला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून वापरावं लागेल. नाही तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला वापरून एका फिरकीपटूला बाहेर बसवावं लागेल.’, असं आर अश्विन प्लेइंग इलेव्हनबाबत म्हणाला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.