AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर भारतीय संघाने नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यातील विजय सोपा नव्हता. हा सामना कुठे फिरला त्याबाबत कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं.

India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं
India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलंImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Nov 03, 2025 | 1:16 AM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आणि जेतेपद आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभल केला आणि विजयाची चव चाखली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला होता. कर्णधार लॉरा वॉल्वार्डने या प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजी निमंत्रण दिलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या. तसेच विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना कर्णधार लॉरा वॉल्वार्डने कडवी झुंज दिली. एक वेळ अशी आली होती की हा सामना हातून निघून जातो की असं वाटत होतं. कारण एका बाजून लॉरा खंबीरपणे भारतीय गोलंदाजांचा सामना करत होती. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी भारताला खूपच झुंजावं लागलं. पण या विकेटसाठी हरमनप्रीत कौरने टाकलेले फासे योग्य पडले आणि टीम इंडिया सामन्यात आली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर सांगितलं की, ‘जेव्हा लॉरा आणि सुने फलंदाजी करत होत्या. तेव्हा सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मी फक्त शफाली तिथे उभी असल्याचे पाहिले. तिने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा विचार केला आणि मला वाटलं की आज तिचा दिवस आहे. मला वाटले की मला माझ्या अंतर्मनाचं ऐकावं लागेल. जर माझे मन म्हणत असेल तर मला तिला किमान एक षटक द्यावे लागेल. हा निर्णय आमच्यासाठी टर्निंग पॉइंट होता. जेव्हा ती संघात आली, तेव्हा आम्ही तिला बोललो की आम्हाला 2-3 षटके लागतील. ती म्हणाली की जर तुम्ही मला गोलंदाजी दिली तर मी दहा षटके टाकेन. तिचे श्रेय तिला जाते, ती खूप सकारात्मक होती आणि ती संघासाठी तिथे होती.’

शफाली वर्माने अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी आणि विजयाची शिल्पकार ठरली. तिने फलंदाजीत 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 87 धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही योगदान दिलं. शफाली वर्माने 7 षटकं टाकली आणि 36 धावा देत दोन गडी बाद केले. तिच्या या कामगिरीमुळे भारताला विजयाची चव चाखता आली. शफाली वर्मा म्हणाली की, ‘मी सुरुवातीलाच म्हणाले होते की देवाने मला काहीतरी चांगले करण्यासाठी येथे पाठवले आहे आणि ते आज दिसून आले. आम्ही जिंकलो याचा खूप आनंद आहे आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ते कठीण होते पण मला स्वतःवर विश्वास होता.’

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.