AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर भारतीय संघाने नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यातील विजय सोपा नव्हता. हा सामना कुठे फिरला त्याबाबत कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं.

India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं
India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलंImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Nov 03, 2025 | 1:16 AM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आणि जेतेपद आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभल केला आणि विजयाची चव चाखली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला होता. कर्णधार लॉरा वॉल्वार्डने या प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजी निमंत्रण दिलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या. तसेच विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना कर्णधार लॉरा वॉल्वार्डने कडवी झुंज दिली. एक वेळ अशी आली होती की हा सामना हातून निघून जातो की असं वाटत होतं. कारण एका बाजून लॉरा खंबीरपणे भारतीय गोलंदाजांचा सामना करत होती. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी भारताला खूपच झुंजावं लागलं. पण या विकेटसाठी हरमनप्रीत कौरने टाकलेले फासे योग्य पडले आणि टीम इंडिया सामन्यात आली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर सांगितलं की, ‘जेव्हा लॉरा आणि सुने फलंदाजी करत होत्या. तेव्हा सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मी फक्त शफाली तिथे उभी असल्याचे पाहिले. तिने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा विचार केला आणि मला वाटलं की आज तिचा दिवस आहे. मला वाटले की मला माझ्या अंतर्मनाचं ऐकावं लागेल. जर माझे मन म्हणत असेल तर मला तिला किमान एक षटक द्यावे लागेल. हा निर्णय आमच्यासाठी टर्निंग पॉइंट होता. जेव्हा ती संघात आली, तेव्हा आम्ही तिला बोललो की आम्हाला 2-3 षटके लागतील. ती म्हणाली की जर तुम्ही मला गोलंदाजी दिली तर मी दहा षटके टाकेन. तिचे श्रेय तिला जाते, ती खूप सकारात्मक होती आणि ती संघासाठी तिथे होती.’

शफाली वर्माने अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी आणि विजयाची शिल्पकार ठरली. तिने फलंदाजीत 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 87 धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही योगदान दिलं. शफाली वर्माने 7 षटकं टाकली आणि 36 धावा देत दोन गडी बाद केले. तिच्या या कामगिरीमुळे भारताला विजयाची चव चाखता आली. शफाली वर्मा म्हणाली की, ‘मी सुरुवातीलाच म्हणाले होते की देवाने मला काहीतरी चांगले करण्यासाठी येथे पाठवले आहे आणि ते आज दिसून आले. आम्ही जिंकलो याचा खूप आनंद आहे आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ते कठीण होते पण मला स्वतःवर विश्वास होता.’

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....