AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डे-नाईट कसोटी सामने का होत नाहीत? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे कसोटी सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. असं असताना पिंक टेस्ट क्रिकेट अर्थात डे नाईट कसोटी सामने का भरवले जात नाहीत? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्यावर आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी उत्तर दिलं आहे.

डे-नाईट कसोटी सामने का होत नाहीत? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले...
| Updated on: Aug 15, 2024 | 5:13 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील सध्याच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. उर्वरित 10 कसोटी सामन्यापैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान पक्कं करेल. बांगलादेशविरुद्ध 2 सामने, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने आहेत. पण या कसोटी मालिकेत एकही पिंक बॉल टेस्ट अर्थात डे-नाईट टेस्ट नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना हा फॉर्मेट बंद झाला की काय? असा प्रश्न पडला आहे. पिंक बॉल कसोटी सामन्याला 27 नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट राखून जिंकला होता. त्यानंतर पिंक बॉल टेस्टचं पर्व सुरु झालं. पण एका वर्षात दोन किंवा तीन कसोटी सामन्यांचं आयोजन होत असल्याचं दिसत आहे. 2023 या वर्षात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात एकमेव पिंक बॉल टेस्ट झाली. तसेच या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकमेव सामना झाला. हा सामना वेस्ट इंडिजने 8 धावांनी जिंकला.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी चर्चा करताना म्हणाले की, ‘तुम्ही पाच दिवसीय सामन्यासाठी तिकीट खरेदी करता. पण हा सामना दोन ते तीन दिवसात संपतो. काहीच रिफंड मिळत नाही. मी याबाबत थोडा भावुक आहे.’ भारतात तीन कसोटी सामने खेळले गेले. तिन्ही कसोटी सामने तीन दिवसापेक्षा जास्त काळ चालले नाहीत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेलेला सामना फक्त दोन दिवसात संपला. भारताने ऑस्ट्रेलियात एकमेव डे नाईट कसोटी सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघ फक्त 36 धावा करून ऑलआऊट झाला. 87 वर्षातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या होती.

भारतीय संघ आतापर्यंत चार पिंक बॉल कसोटी सामने खेळला आहे. पहिला कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये खेळला गेला. ईडन गार्डनवर हा सामना झाला. हा सामना भारताने एक डाव आणि 46 धावांनी जिंकला. दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020 मध्ये खेळला गेला. ओव्हल मैदानात खेळलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून विजय मिळवला. तिसरा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. चौथा पिंक बॉल कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध 2022 मध्ये खेळला गेला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात खेळलेल्या या सामन्यात भारताने 238 धावांनी विजय मिळवला.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.