AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाने अखेर ते गाणं रिलीज केलं, 4 वर्षांपासून होती प्रतीक्षा

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी धुव्वा उडवला. यासह 52 वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयानंतर भारताच्या महिला संघाने गाणं गायलं. हे गाणं चार वर्षांपूर्वी तयार केलं होतं. मात्र ते गाणं आता रिलीज करण्याची संधी मिळाली.

Video: वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाने अखेर ते गाणं रिलीज केलं, 4 वर्षांपासून होती प्रतीक्षा
Video: वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाने अखेर ते गाणं रिलीज केलं, 4 वर्षांपासून होती प्रतीक्षाImage Credit source: PTI
| Updated on: Nov 03, 2025 | 4:35 PM
Share

भारतीय महिला संघाचं प्रदीर्घ कालावधीनंतर स्वप्न पूर्ण झालं आहे. वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद 52 वर्षांनी मिळवलं आहे. वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताला यापूर्वी 2005 आणि 2017 साली जेतेपदाची संधी होती. पण दोन्ही वेळेस भारताच्या पदरी निराश पडली. पण यंदाच्या पर्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने जेतेपद मिळवलं आणि स्वप्नपूर्ती केली. भारतीय महिला संघाने या विजयानंतर एक गाणं गायलं. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कारण हे गाणं चार वर्षांपूर्वी तयार केलं होतं. मात्र या दरम्यान तीन वर्ल्डकप गमावल्यानंतर आता कुठे विजयी गाणं गाण्याची संधी मिळाली. बीसीसीआयने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या गाण्याची रचना अप्रतिम असून प्रेरणादायी आहे. जेमिमा रॉड्रिग्सने या गाण्याची पार्श्वभूमी सांगितली आणि त्यानंतर संघाने गाण्यास सुरुवात केली.

जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली की, संघाने हे निश्चित केलं होतं की हे गाणं तेव्हाच जाहीर करायचं जेव्हा आपण पहिला वर्ल्डकप जिंकू. त्यानंतर संपूर्ण संघाने मिळून एका सुरात हे गाणं गायलं. ‘टीम इंडिया, टीम इंडिया, कर दें सबकी हवा टाइट, टीम इंडिया लड़ने आई है, कोई ना ले हमको लाइट, हमारा फ्यूचर है ब्राइट, ना लेगा कोई पंगा, कर देंगे हम दंगा…चांद पर चलेंगे, साथ में उठेंगे, हम हैं टीम इंडिया, हम साथ में जीतेंगे. ना लेगा कोई पंगा, कर देंगे हम दंगा. रहेगा सबसे ऊपर, हमारा तिरंग.हम हैं टीम इंडिया, हम हैं टीम इंडिया, हम हैं टीम इंडिया.’

भारतीय महिला संघाचा जेतेपदापर्यंत प्रवास खडतर होता. खरं तर उपांत्य फेरीचं गणितही भारताने काठावर पास केलं . त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने ठेवलेलं 338 धावांचं लक्ष्य म्हणजे सामना हातून गेला असंच वाटत होतं. पण भारतीय महिला संघाने सर्वांवर मात करत जेतेपदाची चव चाखली. भारतीय महिला क्रिकेट पर्वाची ही सुरुवात आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आतापर्यंत हा पुरूषांचा खेळ म्हणून दृष्टीकोन होता. मात्र आता महिलांनाही क्रिकेटमध्ये काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळणार आहे. खऱ्या अर्थाने हा वनडे वर्ल्डकप येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा असणार आहे. जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक क्रिकेटप्रेमी तरूणी भविष्यात क्रिकेटचे धडे गिरवतील.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.