AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“फक्त ‘ही’ एक गोष्ट केली तर टीम इंडिया दुसऱ्यांदा वर्ल्ड कप 2023 जिंकू शकते”

World Cup 2023 : घरच्या मैदानावर वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडिसाठी ही मोठी संधी असणार आहे. अशातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या मते एक गोष्ट केली तर परत एकदा टीम इंडिया परत एकदा चॅम्पियन होऊ शकते. 

फक्त 'ही' एक गोष्ट केली तर टीम इंडिया दुसऱ्यांदा वर्ल्ड कप 2023 जिंकू शकते
| Updated on: Aug 29, 2023 | 8:56 PM
Share

मुंबई : आगामी वर्ल्ड कप 2023 चा थरार 5 ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार आहे. भारतामध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आल्यान टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळीही भारताकडेच वर्ल्डकपचं यजमानपद होतं. यंदा रोहित अँड कंपनी आपली पूर्ण ताकद लावताना दिसेल. कारण घरच्या मैदानावर वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडिसाठी ही मोठी संधी असणार आहे. अशातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या मते एक गोष्ट केली तर परत एकदा टीम इंडिया परत एकदा चॅम्पियन होणार आहे.

नेमकी कोणती आहे ती गोष्ट?

टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी असून संघाला सामने घरच्या मैदानावर असल्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला तगड्या संघाचा सामना करावा लागणार आहे. 2011 ला तशा प्रकारे संघांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियासंघाविरूद्ध सर्व संघ ताकदीने खेळला होता. मला वाटतं की यावेळीसुद्धा संपूर्ण टीम ताकदीने खेळली तर वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी असल्याचं ईशांत शर्मा याने म्हटलं आहे. जिओ सिनेमाच्या होम ऑफ हीरोजच्या शोमध्ये तो बोलत होता.

ईशांत शर्मा याने सांगितल्यानुसार टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी आहे. मात्र टीम इंडियासमोर खडतर आव्हान असणार आहे.  कारण आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू भारतामध्ये खेळून गेले असल्याने त्यांनाही भारतीय ग्राऊंडचा चांगला अंदाज असणार आहे. त्यामुळे परदेशी आयपीएल स्टार खेळाडूंसाठी मिनि होम ग्राऊंड असल्यासारखं आहे.

टीमसाठी आनंदाची बातमी:-

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे दुखापती झालेले मुख्य खेळाडू संघात परतले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसप्रीत बुमराहच्या येण्याने गोलंदाजीची धार वाढली आहे. वर्ल्ड कप आधी टीम इंडियाला आशिया कप जिंकण्याचं आव्हान असणार आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असून टीम इंडियाचे सामने श्रीलंकेमध्ये पार पडले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये रंगणार असून या सामन्यापासून आशिया कपच्या थराराला सुरूवात होणार आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.