AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus WTC Final Day 2 : आज बाजी पलटवायची असेल, तर टीम इंडियाला एकच गोष्ट करावी लागेल, असा हवा गेम प्लान

Ind vs Aus WTC Final Day 2 : पहिल्या दिवशी केलेली एक चूक टीम इंडियाला टाळावी लागेल. आता प्रश्न हा आहे की, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा प्लान काय असेल? मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया काय करणार?

Ind vs Aus WTC Final Day 2 : आज बाजी पलटवायची असेल, तर टीम इंडियाला एकच गोष्ट करावी लागेल, असा हवा गेम प्लान
ind vs aus wtc final 2023 Image Credit source: AFP
| Updated on: Jun 08, 2023 | 8:39 AM
Share

लंडन : ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला दिवस टीम इंडियासाठी कुठल्या झटक्यापेक्षा कमी नाहीय. हिरवागार पीच, आकाशात ढगांची दाटी आणि सकाळची हवा हे तीन घटक लक्षात घेऊन टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 15 मिनिटात ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट काढून टीमने दमदार सुरुवात केली. पण दिवसअखेरीस पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाच वर्चस्व दिसून आलं. आता प्रश्न हा आहे की, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा प्लान काय असेल? मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया काय करणार?

बुधवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने फक्त 3 विकेट गमावल्या आहेत. दुसऱ्यादिवशी दुसऱ्या सेशनच्या दुसऱ्या ओव्हरपर्यंत 3 बाद 76 धावा ऑस्ट्रेलियाची स्थिती होती. त्यानंतर ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथने 251 धावांची नाबाद भागीदारी केली. पहिल्या दिवस अखेर 3 बाद 327 ऑस्ट्रेलियाची स्थिती आहे. हेड आणि स्मिथमुळे टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड दिसतेय.

आज सुरुवातीला एकच गोष्ट करावी लागेल

टीम इंडियाला आज दुसऱ्यादिवशी लवकर कसोटीवर नियंत्रण मिळवाव लागेल. अन्यथा विजेतेपदाचा स्वप्न भंग होऊ शकतं, ऑस्ट्रेलियाचे विकेट मिळवायचे असतील, टीम इंडियाला नव्या चेंडूने सुरुवात करावी लागेल. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये 90 ऐवजी 85 ओव्हर्सचा खेळ झाला. तिसऱ्या सेशनपर्यंत वेगवान गोलंदाजांना पीच आणि हवेकडून मदत मिळणं जवळपास बंद झालं होतं.

काल टीम इंडियाने तो पर्याय निवडला नव्हता

चेंडू जुना झालाय. पण पीच असा नाहीय की, त्यावर रिव्हर्स स्विंग किंवा स्पिन गोलंदाजांना मदत मिळेल. भारताने 80 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाल्यानंतर नव्या चेंडूचा पर्याय निवडला नव्हता. गुरुवारी म्हणजे आज टीम इंडियाला नवा चेंडू घ्यावा लागेल. आज दुसऱ्यादिवशी सकाळी एक-दीडतास खेळपट्टीकडून मदत मिळू शकते. त्यावेळी टीम इंडियाला दबाव बनवता येईल.

तिसऱ्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाने किती धावा केल्या?

या पीचवर विकेट मिळणं सोप नाहीय. स्मिथ आणि हेड विकेटवर सेट झालेत. तिसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाचे गोलंदाज धावगतीला लगाम घालू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सेशनमध्ये 34 ओव्हर्समध्ये 4.62 च्या सरासरीने 157 धावा केल्या.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

ऑस्ट्रेलियाला किती धावांवर रोखाव लागेल?

टीम इंडियाला आज धावगतीला ब्रेक लावावा लागेल. असं झाल्यास विकेट मिळण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीची तितकी चांगली साथ दिली नाही. शार्दुलने 4 नो बॉल टाकले. टीम इंडियाला आज ऑस्ट्रेलियाला 400-420 धावांच्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. असं झालं नाही, तर विजयाची शक्यता जवळपास संपुष्टात येईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.