IND vs ZIM: ‘आम्हीच जिंकणार वनडे सीरीज’, इनोसेंट कायाचा दावा

भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळण्यासाठी झिम्बाब्वे मध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू नसतानाही भारताची बाजू वरचढ दिसतेय.

IND vs ZIM: 'आम्हीच जिंकणार वनडे सीरीज', इनोसेंट कायाचा दावा
Inocent-kaya
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 5:23 PM

मुंबई: भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळण्यासाठी झिम्बाब्वे मध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू नसतानाही भारताची बाजू वरचढ दिसतेय. भारतासमोर तुलनेने कमकुवत असलेल्या झिम्बाब्वेला नमवण्यात कुठलीही अडचण येऊ नये. झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश विरुद्ध मिळालेल्या विजयाने उत्साहीत आहे. अशा स्थितीत झिम्बाब्वेला कमी लेखून चालणार नाही. झिम्बाब्वे संघातील फलंदाज इनोसेंट कायाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. झिम्बाब्वेचा संघ 2-1 ने वनडे सीरीज जिंकेल, अशी भविष्यवाणी कायाने केली आहे.

मला सर्वाधिक धावा आणि शतक ठोकायचं आहे

इनोसेंट काया एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, “ही सीरीज 2-1 ने झिम्बाब्वे जिंकेल. व्यक्तीगत बोलायच झाल्यास, मला सर्वाधिक धावा आणि शतक ठोकायचं आहे. सीरीज मधील यशस्वी फलंदाज बनण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. तेच माझे लक्ष्य असेल”

हीच बाब आमच्या पथ्यावर पडेल

इनोसेंट कायाने यावर्षी डेब्यु केला. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. हीच बाब आमच्या पथ्यावर पडेल, असा कायाचा दावा आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या सीरीजचा भाग नाहीयत.

मला विश्वास आहे, मी….

“विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा नसतात, त्यावेळी भारतीय क्रिकेटपटू जास्त गांभीर्याने क्रिकेट खेळतात. झिम्बाब्वे दौऱ्यावर येणारा भारतीय संघ मजबूत आहे, हे मला ठाऊक आहे. त्याच्याविरुद्ध खेळणं सोप आहे, असं म्हणून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला विश्वास आहे, मी भारताविरुद्ध चांगला खेळ दाखवीन” असं इनोसेंट काया म्हणाला.

बांगलादेश विरुद्ध शानदार प्रदर्शन

या डावखुऱ्या फलंदाजाने बांगलादेश विरुद्ध 2-1 ने मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कायाने हरारे मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 110 धावांची शतकी खेळी खेळला. त्याने या सामन्यात चौथ्या विकेटसाठी सिकंदर राजासोबत 192 धावांची भागीदारी केली. रजा नाबाद 135 धावा बनवून सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.