AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: ‘आम्हीच जिंकणार वनडे सीरीज’, इनोसेंट कायाचा दावा

भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळण्यासाठी झिम्बाब्वे मध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू नसतानाही भारताची बाजू वरचढ दिसतेय.

IND vs ZIM: 'आम्हीच जिंकणार वनडे सीरीज', इनोसेंट कायाचा दावा
Inocent-kaya
| Updated on: Aug 15, 2022 | 5:23 PM
Share

मुंबई: भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळण्यासाठी झिम्बाब्वे मध्ये दाखल झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू नसतानाही भारताची बाजू वरचढ दिसतेय. भारतासमोर तुलनेने कमकुवत असलेल्या झिम्बाब्वेला नमवण्यात कुठलीही अडचण येऊ नये. झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश विरुद्ध मिळालेल्या विजयाने उत्साहीत आहे. अशा स्थितीत झिम्बाब्वेला कमी लेखून चालणार नाही. झिम्बाब्वे संघातील फलंदाज इनोसेंट कायाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. झिम्बाब्वेचा संघ 2-1 ने वनडे सीरीज जिंकेल, अशी भविष्यवाणी कायाने केली आहे.

मला सर्वाधिक धावा आणि शतक ठोकायचं आहे

इनोसेंट काया एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, “ही सीरीज 2-1 ने झिम्बाब्वे जिंकेल. व्यक्तीगत बोलायच झाल्यास, मला सर्वाधिक धावा आणि शतक ठोकायचं आहे. सीरीज मधील यशस्वी फलंदाज बनण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. तेच माझे लक्ष्य असेल”

हीच बाब आमच्या पथ्यावर पडेल

इनोसेंट कायाने यावर्षी डेब्यु केला. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता आहे. हीच बाब आमच्या पथ्यावर पडेल, असा कायाचा दावा आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या सीरीजचा भाग नाहीयत.

मला विश्वास आहे, मी….

“विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा नसतात, त्यावेळी भारतीय क्रिकेटपटू जास्त गांभीर्याने क्रिकेट खेळतात. झिम्बाब्वे दौऱ्यावर येणारा भारतीय संघ मजबूत आहे, हे मला ठाऊक आहे. त्याच्याविरुद्ध खेळणं सोप आहे, असं म्हणून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला विश्वास आहे, मी भारताविरुद्ध चांगला खेळ दाखवीन” असं इनोसेंट काया म्हणाला.

बांगलादेश विरुद्ध शानदार प्रदर्शन

या डावखुऱ्या फलंदाजाने बांगलादेश विरुद्ध 2-1 ने मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कायाने हरारे मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 110 धावांची शतकी खेळी खेळला. त्याने या सामन्यात चौथ्या विकेटसाठी सिकंदर राजासोबत 192 धावांची भागीदारी केली. रजा नाबाद 135 धावा बनवून सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

Follow Us
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला