AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: टीम इंडियाचा खेळाडू पासपोर्ट आणि मोबाईल विसरला! पाहा व्हीडिओ

Team India: टीम इंडियाचा खेळाडू उत्साहात पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओत या खेळाडूने हा सर्व किस्सा सांगितला आहे. पाहा तो कोण आहे?

Team India: टीम इंडियाचा खेळाडू पासपोर्ट आणि मोबाईल विसरला! पाहा व्हीडिओ
yashasvi jaiswal and riyan parag rrImage Credit source: rr x account
| Updated on: Jul 03, 2024 | 4:05 PM
Share

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतात येण्यासाठी उत्सूक आहे. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफ गुरुवारी 4 जुलै रोजी पहाटे नवी दिल्लीत पोहचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत डबल डेकर (ओपन डेक) बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया कधी मुंबईत येतेय, याची प्रतिक्षा आहे. तर दुसर्‍या बाजूला टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही झिंबाब्वेला पोहचली आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहे. याआधी टीम इंडियाचा एक युवा खेळाडू हा आपला पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. याबाबतची माहिती त्या खेळाडूने दिली.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या या युवा खेळाडूंचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हीडिओत रियान परागने याबाबतची माहिती दिली आहे. रियान परागची टीम इंडियात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रियान टीम इंडियासाठी खेळण्याच्या उत्साहात पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. रियानने व्हीडिओत काय म्हटलंय जाणून घेऊयात.

रियान पराग काय म्हणाला?

“लहानपणापासून प्रवास करण्याचं स्वप्न होतं. आम्ही मॅच तर खेळतच असतो, पण त्यासह टीमसह प्रवास करणं, इंडियाची जर्सीसह जाणं हे भारी असतं. मी इतका उत्सूक होतो की पोसपोर्ट आणि मोबाईल विसरलो होतो, मी विसरलो नाही फक्त पासपोर्ट आणि मोबाईल दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. आता माझ्याकडे आहे”, असं रियानने म्हटलं.

उत्साहाच्या भरात गडबड

“टीममध्ये नवे चेहरे आहेत, पण माझ्यासाठी ते ओळखीचे आहेत. आम्ही एकत्र खेळलो आहोत. लहानपणापासून हे स्वप्न पाहत होतो, ते आज पूर्ण झालं, त्यामुळे आनंद जास्त आहे. जेव्हा पहिला सामना कोणत्याही ग्राउंडवर खेळेन, तो क्षण मला काय लक्षात राहिलं”, अशा शब्दात रियानने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Follow Us
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.