Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध कसोटी, भारताचा ‘हा’ खेळाडू मॅच फिरवू शकतो, माजी क्रिकेटपटूचं भाकीत

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England test) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध कसोटी, भारताचा 'हा' खेळाडू मॅच फिरवू शकतो, माजी क्रिकेटपटूचं भाकीत
India vs England
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 11:45 AM

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England test) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्या म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर (Chennai test) पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या मालिकेसाठी भारताने 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेत दुखापत आणि अन्य कारणांमुळे खेळू न शकलेले खेळाडू आता टीम इंडियात (Team India) परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघ आणखी मजबूत झाला आहे.

भारतीय संघात आता क्रिकेटतज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे ते अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कामगिरीकडे. कारण हार्दिक पांड्याकडे मॅच फिरवण्याची क्षमता आहे, असा माजी क्रिकेटपटूंना विश्वास आहे. (England vs India first test at chennai all eyes on hardik pandya)

हार्दिक पांड्या मैदानाव

हार्दिक पांड्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मैदानात परतला आहे. एकीकडे दुखापत, दुसरीकडे वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवून, हार्दिक पांड्या इंग्लंडशी दोन हात करणार आहे. मात्र दुखापतीमुळे त्याने अद्याप गोलंदाजीचा सराव सुरु केलेला नाही. पांड्या नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये केवळ फलंदाज म्हणून पांड्याला स्थान मिळणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (world test championship) फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला 4 सामन्यांची मालिका किमान 2-0 ने तरी जिंकावी लागणार आहे. मात्र इंग्लंडसारखा तगडा संघ समोर असताना, भारतासमोर हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे विराट कोहली कोणत्या 11 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या मते, “भारतात खेळताना कदाचित हार्दिक पांड्याचं महत्त्व कळणार नाही, पण परदेशात पांड्यासारखा खेळाडू आवश्यक आहे. भारतात आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवडलं जातं. मात्र परदेशात पांड्याचं महत्त्व दहापटीने वाढतं”

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अत्यंत अटीतटीची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची भारताला चांगली संधी आहे. फायनलसाठी हार्दिक पांड्या महत्त्वाचा शिलेदार आहे, असंही दासगुप्ताने सांगितलं.

हार्दिक पांड्याचं ट्वीट

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना-चेन्नई-5-9 फेब्रुवारी

दूसरा सामना – चेन्नई-13ते17 फेब्रुवारी

तिसरा सामना-अहमदाबाद- 24 ते 28 फेब्रुवारी

चौथा सामना-अहमदाबाद-4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

(England vs India first test at chennai all eyes on hardik pandya)

संबंधित बातम्या 

IND Vs ENG : …म्हणून भारतीय संघ इंग्लंडला चारी मुंड्या चित करणार, गौतम गंभीरची भविष्यवाणी

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.