AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : परिस्थिती पाहून गंभीर यांनी पटकन अशी चाल खेळली की.. याच मास्टर स्ट्रोकने टीम इंडियाला मिळवून दिलं फायनलचं तिकिट

IND vs ENG 2nd SemiFinal : बुद्धीबळाच्या पटावर जशा चाली रचल्या जातात, तशाच गंभीर यांनी डगआऊट एरियामध्ये बसून हे झटपट निर्णय घेतले. या दोन चाली कोणाच्या लक्षात आल्या नाहीत. पण टीम इंडियाला फायनलचं तिकीट मिळवून देण्यात हा मास्टरस्ट्रोक ठरला.

IND vs ENG : परिस्थिती पाहून गंभीर यांनी पटकन अशी चाल खेळली की.. याच मास्टर स्ट्रोकने टीम इंडियाला मिळवून दिलं फायनलचं तिकिट
ind vs eng Image Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2026 | 9:47 AM
Share

IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री चाहत्यांना क्रिकेटचा थरार पहायला मिळाला. टीम इंडियाने इंग्लंडला 7 धावांनी हरवून टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता 8 मार्चला रविवारी टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या विजयाची खरी स्टोरी हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांच्या प्लानिंगमध्ये दडली आहे. मॅचमध्ये इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होता. त्यावेळी कोच गंभीर यांनी धक्का तंत्राचा वापर केला. त्यांनी शिवम दुबेला नंबर 4 वर फलंदाजीला पाठवलं. दुबे लेग स्पिनरला दूर-दूरपर्यंत मारु शकतो हे गंभीर यांना माहित होतं. म्हणून त्यांनी शिवम दुबेला चौथ्या नंबरवर फलंदाजीला पाठवलं.

याआधी नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यातही शिवम दुबेने चौथ्या नंबरवर येऊन 66 धावा तडकावल्या होत्या. तो प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता. शिवम दुबेला चौथ्या नंबरवर पाठवण्याची चाल यशस्वी ठरली. त्याने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्यामुळे रशीद दबावाखाली आला आणि इंग्लंडची रणनिती फेल झाली.

हा बदल टीम इंडियाच्या पथ्यावर पडला

सर्वात जास्त हैराण करणारा निर्णय म्हणजे तिलक वर्माचा फलंदाजीचा क्रम बदलणं. तिलक वर्माला तीन नंबर वरुन थेट 7 व्या नंबरवर फलंदाजीला आणणं. पहिल्यांदा कोणीतरी तिलकला इतक्या खाली खेळताना पाहिलय. शेवटच्या ओव्हर्समध्ये पहिल्या चेंडूपासून सिक्स मारण्याची क्षमता असलेला खेळाडू क्रीझवर हवा हा विचार त्यामागे होता. म्हणून तिलकच्या फलंदाजीचा क्रम बदलला, जो टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. तिलकने 7 चेंडूत 21 धावा चोपल्या.

..तर निकालही अपेक्षित येतो

भारत आणि इंग्लंडच्या जय-पराजयामध्ये फक्त 7 धावांचं अंतर आहे. तिलकच्या छोट्याशा पण तितक्याच महत्वाच्या इनिंगकडे जय-पराजयामधलं अंतर म्हणून पाहता येईल. बुद्धीबळाच्या पटावर जशा चाली रचल्या जातात, तशाच गंभीर यांनी डगआऊट एरियामध्ये बसून हे झटपट निर्णय घेतले. कॉमेंट्री बॉक्समधील माजी क्रिकेटरही यामुळे थक्क झाले. सेमीफायनल सारख्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडिया बॅटिंग ऑर्डरमध्ये इतका मोठा धोका पत्करेल हा विचार कोणीच केला नव्हता. धोका पत्करण्याची तयारी असेल तर निकालही अपेक्षित येतो हे गंभीर-सूर्याच्या जोडीने दाखवून दिलय. आता सगळ्यांच्या नजरा 8 मार्चला होणार्‍या भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यावर आहेत.

Follow Us
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत