AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण टीम इंडियाकडून एकाही खेळाडूला पत्रकार परिषदेला न पाठवल्यामुळे मीडियाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या वतीने कोण बोलणार याची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती. […]

... म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार
| Edited By: | Updated on: Jun 03, 2019 | 10:26 PM
Share

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण टीम इंडियाकडून एकाही खेळाडूला पत्रकार परिषदेला न पाठवल्यामुळे मीडियाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या वतीने कोण बोलणार याची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती.

या विश्वचषकात आयसीसीने एक प्रोटोकॉल तयार केलाय. याअंतर्गत प्रत्येक संघाला दररोजच्या कार्यक्रमाची माहिती मीडियाला द्यावी लागते. यामध्ये संघातील खेळाडूंचा सराव यासह पत्रकार परिषदेचीही माहिती देणं आवश्यक असतं. सोमवारी टीम इंडियाकडून साऊथेम्पटनमध्ये पत्रकार परिषद घेतली जाणार होती. पण भारतीय संघाचा एकही खेळाडू उपस्थित राहिला नाही.

काही वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने मीडिया प्रतिनिधींनी सांगितलं की भारतीय संघाने अजून एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय बोलतील? शिवाय संघ व्यवस्थापनाकडून कळवण्यात आलं की गोलंदाज दीपक चहर आणि आवेश खान मीडियासोबत बातचीत करु शकतात. यानंतर संतापलेल्या मीडिया प्रतिनिधींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडिया 24 मे रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकमेव खेळाडू म्हणजे केएल राहुलनेच मीडियासोबत संवाद साधलाय. राहुलने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला. तेव्हापासून आतापर्यंत मीडियाला भारतीय संघाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.