AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण टीम इंडियाकडून एकाही खेळाडूला पत्रकार परिषदेला न पाठवल्यामुळे मीडियाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या वतीने कोण बोलणार याची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती. […]

... म्हणून इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 03, 2019 | 10:26 PM
Share

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला होतोय. या सामन्यापूर्वीच टीम इंडिया चर्चेत आहे. सोमवारी भारतीय संघाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण टीम इंडियाकडून एकाही खेळाडूला पत्रकार परिषदेला न पाठवल्यामुळे मीडियाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या वतीने कोण बोलणार याची माहिती मीडियाला देण्यात आली नव्हती.

या विश्वचषकात आयसीसीने एक प्रोटोकॉल तयार केलाय. याअंतर्गत प्रत्येक संघाला दररोजच्या कार्यक्रमाची माहिती मीडियाला द्यावी लागते. यामध्ये संघातील खेळाडूंचा सराव यासह पत्रकार परिषदेचीही माहिती देणं आवश्यक असतं. सोमवारी टीम इंडियाकडून साऊथेम्पटनमध्ये पत्रकार परिषद घेतली जाणार होती. पण भारतीय संघाचा एकही खेळाडू उपस्थित राहिला नाही.

काही वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने मीडिया प्रतिनिधींनी सांगितलं की भारतीय संघाने अजून एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय बोलतील? शिवाय संघ व्यवस्थापनाकडून कळवण्यात आलं की गोलंदाज दीपक चहर आणि आवेश खान मीडियासोबत बातचीत करु शकतात. यानंतर संतापलेल्या मीडिया प्रतिनिधींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

टीम इंडिया 24 मे रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत एकमेव खेळाडू म्हणजे केएल राहुलनेच मीडियासोबत संवाद साधलाय. राहुलने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यानंतर मीडियाशी संवाद साधला. तेव्हापासून आतापर्यंत मीडियाला भारतीय संघाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली