IND vs SA : क्रिकेट मॅच रद्द झाल्यास लोकांचे पैसे वाया ? तिकीटाची रक्कम मिळते की नाही; काय आहे नियम ?

Lucknow T20I Cancelled : धुक्यामुळे एखादा सामना किंवा मॅच रद्द झाल्याची घटना क्वचितच घडते. पण काल (17 डिसेंबर) लखनऊमध्ये असंच काहीस घडल्याचं पहायला मिळालं. आता प्रश्न असा आहे की लोकांनी तिकिटांसाठी जे पैसे खर्च केले, त्याचं काय होणार ? ते पैसे परत मिळणार की नाही ?

IND vs SA : क्रिकेट मॅच रद्द झाल्यास लोकांचे पैसे वाया ? तिकीटाची रक्कम मिळते की नाही; काय आहे नियम ?
मॅच रद्द झाल्यावर तिकीटाचे पैसे मिळणार की नाही ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 18, 2025 | 12:02 PM

Lucknow T20 Match : लखनौ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला.  लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर भारत वि. दक्षिण आफ्रिकेच्या ( India vs South Africa) चौथ्या टी-20 सामन्यात (T 20 match) धुकं इतकं दाट होतं की एकही चेंडू खेळणं तर दूरच राहिलं, साधा टॉसही होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. मात्र अशा परिस्थितीत सर्वांच्या मनात एक प्रश्न हमखास आला असेल तो म्हणजे, प्रेक्षकांच्या पैशांचं काय झालं असेल ? त्याना तिकीटांचे पैसे मिळतील की ते वाया जाणारा ? याबद्दल BCCIचे नियम काय आहेत ?

काल लखनौमध्ये, धुके दूर होऊन सामना पुन्हा सुरू होईल या आशेने तीन तास वाट पाहावी लागली. पण, कोणताही उपाय न सापडल्याने, अखेर तो सामनाच रद्द करण्यात आला, ज्यामुळे चाहते निराश झाले आणि घरी परतले.

मॅच रद्द झाल्यास तिकीटांचे पैसे परत मिळण्याबाबत काय आहेत नियम ?

आता प्रश्न असा आहे की, तिकिटांच्या परतफेडीचे काय? चाहत्यांना त्यांचे पैसे मिळतील का? याबाबत बीसीसीआयचे दोन नियम आहेत. पहिल्या नियमात असे म्हटले आहे की जर एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला तर तिकीट बुकिंग शुल्क कापून उर्वरित पैसे क्रिकेट चाहत्यांना परत केले जातील. पण दुसऱ्या नियमात असे म्हटले आहे की जर सामना सुरू झाला आणि नंतर हवामानामुळे रद्द झाला तर तिकिटाचे पैसे परत केले जाणार नाहीत.

लखनऊ T20 रद्द, लोकांचे पैसे झाले रद्द ?

तिकिटांच्या परतफेडीबाबत बीसीसीआयचे वर दिलेले नियम जाणून घेतल्यानंतर, आता लखनौमधील क्रिकेट चाहत्यांना निराश होण्याची गरज नाही. सामना पाहू न शकल्याने ते निराश झाले असले तरी त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. ते वाया गेले नाहीत कारण लखनऊमधील T20 मॅच ही एकही चेंडू न टाकताच रद्द झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना त्यांचे पैसे परत मिळतील.

पण क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या तिकिटांचे पैसे कधी परत मिळतील याची माहिती राज्य क्रिकेट असोसिएशन आणि अधिकृत तिकीट भागीदारांकडून लवकरच शेअर करण्यात येईल.

IND vs SA T20 सीरीजचं काय झालं ?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने पहिल्या चार सामन्यांनंतर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कटकमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मुल्लानपूरमध्ये दुसरा टी-20 सामना जिंकला होता. त्यानंतर धरमशाला येथे झालेला तिसरा टी-20 सामना भारताने जिंकत 2-1 अशी आघाडी घेतली. काल लखनौमध्ये होणारा चौथा टी-20 सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघामध्ये आता 5 वा शेवटचा टी-20 सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यात भारत जिंकला तर ही मालिका भारतीय संघ 3-1 ने जिंकेल मात्र दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास ही टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटेल.