तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ, राहुल- विजय बाहेर, सलामीला फ्रेश जोडी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हन अर्थात अंतिम 11 खेळाडूंची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने परंपरेनुसार सामन्याच्या आदल्या दिवशी संघ जाहीर केला. त्यानुसार सातत्याने भारताला अपयशी सुरुवात करुन देणारे सलामीवीर के एल राहुल आणि मुरली विजय यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर मध्यमगती गोलंदाज उमेश यादवही संघातून बाहेर पडला […]

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ, राहुल- विजय बाहेर, सलामीला फ्रेश जोडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हन अर्थात अंतिम 11 खेळाडूंची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने परंपरेनुसार सामन्याच्या आदल्या दिवशी संघ जाहीर केला. त्यानुसार सातत्याने भारताला अपयशी सुरुवात करुन देणारे सलामीवीर के एल राहुल आणि मुरली विजय यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर मध्यमगती गोलंदाज उमेश यादवही संघातून बाहेर पडला आहे. त्यांच्याऐवजी टीम इंडियात मयांक अग्रवाल, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया नव्या सलामीवीरांसह मैदानात उतरेल. भारताकडून मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा किंवा मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा किंवा रोहित शर्मा आणि हनुमा विहारी यापैकी एक जोडी सलामीला उतरु शकते. बीसीसीआयने अंतिम 11 खेळाडूंची नावं ट्विटरवरुन जाहीर केली.

दरम्यान, पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणारा आर अश्विन अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. अश्विनच्या पोटाच्या डाव्या बाजूच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने, अश्विन दुसऱ्या पर्थ कसोटीत खेळू शकला नव्हता.

राहुल-मुरली विजय अपयशी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीमध्ये भारताचे सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. के एल राहुल आणि मुरली विजय या दोघांनाही चांगली सलामी देता आली नाही. त्याचा परिणाम भारतीय फलंदाजी कोसळत गेली. पहिला कसोटी सामना भारताने जिंकला, मात्र दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. पर्थ कसोटीत लोकेश राहुल आणि मुरली या दोघांनी पहिल्या डावात 6 धावांची तर दुसऱ्या डावात 0 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावात राहुलने 2 धावा केल्या होत्या, तर मुरली विजय शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात राहुल शून्यावर तर मुरली विजयला 20 धावा करता आल्या होत्या.

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ – मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका पहिला सामना – 6 डिसेंबर दुसरा सामना – 14 डिसेंबर तिसरा सामना – 26 डिसेंबर चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका पहिला सामना – 12 जानेवारी दुसरा सामना – 15 जानेवारी तिसरा सामना – 18 जानेवारी

संबंधित बातम्या 

के एल राहुल, मुरली विजय विलन, भारताच्या पराभवाची 5 कारणं!  

“मुरली, मला माहितीये एक माणूस म्हणून विराट तुला आवडत नाही”  

इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा मैदानातच भिडले!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.