टीम इंडिया 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर, भारत सरकारने का दिली मंजुरी

Davis Cup IND vs PAK | भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर सामने खेळण्यासाठी जात नाही. दोन्ही देशांतील संबंधामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आता 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर भारतीय डेव्हिस संघ जाणार आहे.

टीम इंडिया 60 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर, भारत सरकारने का दिली मंजुरी
davis cup
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 10:07 AM

नवी दिल्ली, दि.28 जानेवारी 2024 | भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणे थांबत नाही, तोपर्यंत भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर खेळणार नाही, अशी भूमिका भारताकडून घेतली जाते. परंतु आता भारतीय डेव्हीस कप संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत सरकारने भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. तब्बल 60 वर्षानंतर भारतीय टीम पाकिस्तान दौरा करणार आहे. पाकिस्तान उच्चायुक्तांनी भारतीय डेव्हीस कप संघातील खेळाडू आणि इतर स्टाफसाठी व्हिसाही जारी केला आहे. आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान डेव्हिस कपमधील जागतिक ग्रुप-1 मधील सामने होणार आहेत. हे सामने 3 आणि 4 फेब्रवारी रोजी इस्लामाबादमध्ये होणार आहे.

भारताला यामुळे घ्यावा लागला निर्णय

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे (ITF) भारताने डेव्हिड कप स्पर्धेचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ देशांमध्ये ठेवण्याची मागणी केली होती. परंतु आयटीएफकडून भारताची मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस संघाने (AITA) भारत सरकारला आपल्या संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली. जर भारतीय संघाने पाकिस्तान दौरा केला नसता तर अंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ पाकिस्तानला वॉकओवर दिले असते.

यापूर्वी कधी झाला पाकिस्तान दौरा

भारतीय डेव्हिस कप टीमने यापूर्वी 1964 मध्ये पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी पाकिस्तानचा 4-0 असा पराभव भारतीय टीमने केला होता. त्यानंतर 2019 मध्ये दोन्ही संघातील डेव्हीस कपचे सामने कजाकिस्तानमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधामुळे सामने तटस्थ ठिकाणी घेण्याची मागणी भारतीय टेनिस महासंघाने केली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस संघाची मागणी मान्य केली होती. आता डेव्हिस कप स्पर्धेसाठी रविवारी भारतीय संघ पाकिस्तानात रवाना होणार आहे.

हे सुद्धा वाचा

हे खेळाडू बाहेर

स्पर्धेत रामकुमार रामनाथन आणि एन श्रीराम बालाजी एकेरी सामने खेळतील. सुमित नागल आणि शशीकुमार मुकुंद यांनी डेव्हिस चषक सामन्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. बालाजीने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘दुहेरीतून एकेरीकडे वाटचाल करताना, बॅकहँड क्रॉसकोर्ट टाळण्याचे आव्हान आहे. जेव्हा मी एकेरी खेळायचो तेव्हा मी फक्त सर्व्ह आणि व्हॉली वर लक्ष केंद्रित करायचो.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.