भारतीय संघाची थाटात फायनलमध्ये एन्ट्री! एकटीने जिंकवलं टीम इंडियाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणाशी भिडणार?

Asia Cup Final 2026: आशिया कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांगलादेशचे संघ एकमेकांसमोर भिडले ज्यात भारतीय संघाचा विजय झाला. आता फायनलमध्ये कोणाला भिडणार आहे ते पाहा...

भारतीय संघाची थाटात फायनलमध्ये एन्ट्री! एकटीने जिंकवलं टीम इंडियाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणाशी भिडणार?
| Updated on: Sep 11, 2026 | 7:23 AM

भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशला ४० धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत गाठली आहे. या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १०९ धावाच करू शकला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.

या सामन्यात भारतीय संघाची धावसंख्या थोडी कमी असली तरी, फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजांची प्रभावी कामगिरी फलदायी ठरली. भारताची सर्वात मोठी सामनावीर, दीप्ती शर्माने बांगलादेशच्या तीन फलंदाजांना अवघ्या २६ धावांत बाद केले. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मानेही दोन बळी घेतले, तर श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बांगलादेशकडून डावाची सुरुवात करताना दिलारा अख्तरने २१ धावा केल्या, तर शोर्ना अख्तर २२ धावांवर नाबाद राहिली. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानानेही १९ धावा केल्या. शोभना मोस्तारीनेही १८ धावांचे योगदान दिले.

यापूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाने आपल्या निर्धारित षटकांत सहा गडी गमावून १४९ धावा केल्या. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मंधाना दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाली आणि तिने भारताच्या धावसंख्येत केवळ दोन धावांचे योगदान दिले. त्यानंतर शेफाली वर्माने प्रतिका रावलसोबत डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने ४४ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. प्रतिका २४ चेंडूंमध्ये १ षटकार आणि १ चौकारासह २० धावा करून बाद झाली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने डावाची सूत्रे हाती घेतली. तिने आणि शेफाली वर्माने तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूंमध्ये ३३ धावा जोडल्या. शेफाली ४० चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ७ चौकारांसह ६४ धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधाराने रिचा घोषसोबत चौथ्या विकेटसाठी २८ चेंडूंमध्ये ३६ धावा जोडल्या. रिचाने आपल्या खेळीत २ षटकारांसह २१ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. त्यानंतर दीप्ती शर्माने हरमनप्रीतसोबत पाचव्या विकेटसाठी ८ चेंडूंमध्ये २१ धावा जोडल्या. हरमनप्रीत २८ चेंडूंमध्ये दोन षटकारांसह २४ धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून शेफाली वर्माने ४० चेंडूत सर्वाधिक ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. शेफालीने यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यासोबतच भारताकडून २०२६ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक (५०६ धावा) धावा करणारी खेळाडू ठरली आहे. त्यामुळे शेफालीने एकटीने भारताला जिंकवलं असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us